Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा मध्यरात्री 2 वाजता सुरु, शरद पवार म्हणाले, 'लोकसभेच्या निवडणुकीला...'

बारामती शहरातील आमराई परिसरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा बुधवारी 18 जून रोजी मध्यरात्री सुरु होती. यानंतर एकच खळबळ उडाली होती.  

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा मध्यरात्री 2 वाजता सुरु, शरद पवार म्हणाले, 'लोकसभेच्या निवडणुकीला...'

बारामती शहरातील आमराई परिसरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा बुधवारी 18 जून रोजी मध्यरात्री सुरु असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर एकच खळबळ उडाली होती. याचा संबंध माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी जोडला जात होता. अजित पवार स्वत: या निवडणुकीत उभे असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष होतं. यावर आता शरद पवारांनी भाष्य केलं असून बँकेचं नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांच्या सूचना असल्याशिवाय कर्मचारी बँक कसा उघडेल? अशी विचारणा केली आहे.

बारामतीत चाललंय काय? रात्री 11 वाजता सुरु होती बँकेची शाखा; कोणाला वाटले पैसे? मोठा राडा

शरद पवारांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा मध्यरात्री सुरु असल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "लोकसभेची निवडणूक झाली तेव्हाही बँक रात्री 12 का 2 वाजता उघडली होती. या बँकेत हे दुसऱ्यांदा घडलं आहे. बँक कशी उघडी? बँकेचं नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांच्या सूचना असल्याशिवाय कर्मचारी बँक कसा उघडेल? रात्री 2 वाजता लोकांची सेवा करण्याची स्थिती बँकेत दुसऱ्यांदा दिसत आहे, याचा अर्थ काय ते समजा".

"हिदीची सक्ती नको"

शरद पवारांनी हिंदीचा द्वेष करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही असं मत त्यांनी मांडलं आहे. "हिदीची सक्ती नको. हिंदी भाषेचा द्वेष करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही. विद्यार्थ्यांनी यासंबंधी निर्णय घ्यावा. पालक मार्गदर्शन करतील त्यानुसार ते निर्णय घेऊ शकतात. कोणी येत असेल, शिकायचं असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही. ही गोष्ट दुर्लक्ष करुन चालणार नाही," असं शरद पवारांनी सांगितलं आहे.  

पुढे ते म्हणाले की, "देशातील 55 ते 60 टक्के लोक हिंदी बोलतात. सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेचा द्वेष करणं योग्य नाही. पण सक्ती करणं योग्य नाही". 

दरम्यान शरद पवारांनी स्थानिक संस्था, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात बोलताना सांगितलं की, "सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार, आता तीन महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया सुरु होईल. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष आम्ही एकत्र बसू. निवडणुकीला एकत्र सामोरं जाता येईल का यावर चर्चा आणि विचार करु. त्यानंतर एकत्रित निर्णय घेऊ. मुंबईत आम्हा सगळ्यात उद्धव ठाकरेंची ताकद जास्त आहे. तिथे त्यांना विचारात घ्यावं लागेल".

Read More