Abu Azmi Comment On Pandharpur Wari: आषाढी वारीसंदर्भात अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर टीका होताना दिसत आहे. आझमींच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर सर्च स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझमींचं विधान 'फालतू' असल्याचा शेरा दिल्यानंतर या प्रकरणावर आता वारकऱ्यांबरोबरच हिंदू महासभेनं आपली आक्रमक भूमिका मांडली आहे.
सोलापुरात वारकरी संघटनेच्या वतीने टाळ वाजवत आबू आझमींचा निषेध करण्यात आला. सोलापुरात आबू आझमींचा विरोधात वारकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील पार्क चौकात आबू आझमींचा विरोधात आंदोलन करण्यात आले. वादग्रस्त वक्तव्याचा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने टाळ वाजवत निषेध करण्यात आला. भारताची संस्कृती मान्य नसेल तर पाकिस्तानात जाऊन नमाज पठण करण्याचा सल्ला यावेळी आबू आझमींना वारकऱ्यांनी दिला.
अबू आझमींच्या विधानावरुन वारकऱ्यांनाही आक्रमक प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. अबू आझमींना इशारा देताना, "संत श्रींच्या परंपरेचा अपमान खपवून घेतला जाणार नाही," असा स्पष्ट इशारा दिला आहे. “अबू आझमीने तोंड सांभाळून बोलावं, नाहीतर चपलीने तोंड फोडलं जाईल किंवा मुंबईत जाऊन तोंडाला काळं फासून चोप दिला जाईल,” अशी संतप्त प्रतिक्रिया वारकऱ्यांनी यांनी दिली आहे. याचबरोबर जो कोणी काळं फासेल, त्याचा आम्ही सत्कार करू, असेही वारकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. वारी, माऊली आणि वारकऱ्यांविषयी कोणीही अपशब्द काढू नये, अन्यथा संतप्त लोकांची प्रतिक्रिया सहन करावी लागेल, असा इशाराही अबू आझमींना देण्यात आला आहे.
वारीबद्दल अबू आझमी नेमकं काय म्हणाले वाचा येथे क्लिक करुन
हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी अबू आझमींचा एकेरी उल्लेख करत वारी विधानावरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे. "पालखी दर आठवड्यात दिवसाला 5 वेळा नसते हे त्या अबूला समजावून सांगायला हवं," असं आनंद दवे म्हणाले. पुढे बोलताना, "पालखीनंतर एकत्र येऊन देशविरोधाची षडयंत्र केली जात नाहीत. पालखी जाते तेथे हत्यारे असत नाहीत. अतिरेक्यांना लपवून ठेवले जात नाही," असं दवे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना, "अबूला नमाज आणि पालखीचा फरक समजण्यासाठी त्याला एकदा पालखीला घेऊन जावे," असा टोलाही दवेंनी लगावला.
छगन भुजबळ यांनीही अबू आझमींना सुबरीचा सल्ला दिला आहे. "अबू आझामीनी आपापसात कटुता निर्माण होईल अशी वक्तव्यं टाळली पाहिजे. कारण, वरीच्या निमित्ताने एकत्रित येण्याची एक प्रक्रिया आहे यात जातीवाद, धर्मावाद नसतो. मुस्लिम संत शेख मोहम्मद पांडुरंग भक्त आहे त्यांची देखील पालखी निघते. समतेचा संदेश देणारी वारी असते, अशा वेळेला अशी वक्तव्य त्यावर नकोत," असं भुजबळ म्हणाले.