Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Sanjay Raut : मोदींची विष्णूशी तुलना केलेली चालते का? ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा सवाल; भाजपाला केलं लक्ष्य

Sanjay Raut on Narendra Modi :राऊतांनी उद्धव ठाकरेंची भगवान श्रीकृष्णासोबत तुलना केल्याचा आरोप भाजपनं केलाय. भाजपनं केलेल्या आरोपानंतर संजय राऊतांनी देखील पलटवार केलाय. मोदींची छत्रपती आणि भगवान विष्णूसोबत केलेली तुलना चालते का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय.

Sanjay Raut : मोदींची विष्णूशी तुलना केलेली चालते का? ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा सवाल; भाजपाला केलं लक्ष्य

Sanjay Raut on Narendra Modi : संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची श्रीकृष्णासोबत तुलना केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. श्रीकृष्णाशी इतरांची तुलना करणं योग्य नसल्याचं म्हणत बावनकुळेंनी राऊतांवर शरसंधान साधलं. काँग्रेस नेते सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशावेळी संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर बावनकुळेंनी थेट निशाणा साधला होता.

चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या टीकेनंतर संजय राऊतांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय. तसंच उद्धव ठाकरेंची भगवान श्रीकृष्णासोबत तुलना केल्याच्या आरोपांवर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर उदय सामंतांनी देखील त्यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं, मात्र, सामंतांच्या टीकेवरही संजय राऊतांनी पलटवार केलाय. तसंच नरेंद्र मोदींची भगवान विष्णूंसोबत तुलना केलेली चालते का? असा सवाल देखील संजय राऊतांनी केलाय.

संजय राऊत म्हणाले, 'कोणीही कोणाचीही कोणाबरोबरही तुलना केलेली नाही. श्रीकृष्णाची असंख्य नावं आहेत. त्यात उद्धव हे देखील एक नाव आहे. आम्ही कधी बाळासाहेब ठाकरे यांची देवाशी तुलना केली नाही. मात्र, मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेलं चालतं का? असा माझा प्रश्न आहे.” यावर उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्काराने सन्मानित केलं तेव्हा संजय राऊत यांना पोटशूळ का उठला? कोणाचीही देवाशी तुलना केल्याने देवपण येत नाही.'

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी कंठशोष केला. राऊतांनी भगवान श्रीकृष्णासोबत तुलना केल्याचा आरोप करण्यात आला मात्र, यानंतर संजय राऊतांनी देखील भाजप नेत्यांनी मोदींची भगवान विष्णू, छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याची वक्तव्यांची आठवण करुन देत प्रत्युत्तर दिलंय.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्याच्या खासदार कंगना रणौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मोदी हे सामान्य नागरिक नसून ते ईश्वराचा अवतार आहेत असं कंगना यांनी म्हटलं आहे. यापूर्वी देखील कंगना यांनी मोदींची भगवान श्रीकृष्णाशी तुलना केली होती.

Read More