अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील संत शेख महंम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वाद निर्माण झाला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या मंदिराची ओळख आहे. मात्र शेख महंम्मद महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्या शेख अमिन यांनी सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह या नावाने स्ट्रस्ट स्थापन केलीय. त्यामुळे या वादाला तोंड फुटलं आहे.
श्रीगोंद्याचं ग्रामदैवत असलेल्या संत शेख महंम्मद महाराज या मंदिराच्या जीर्णोद्धारावरून आता वाद पेटला आहे. याच ठिकाणी शेख अमीन यांनी एका दर्गाह समितीची निर्मिती केली आहे. स्वत:ला शेख महंमद महारांजा वंशज म्हणवणाऱ्या शेख अमिन यांनी ही ट्रस्ट स्थापन केली आहे.
ही दर्गा समिती शेख महंम्मद महाराजांच्या समाधीस्थळ विकासाला विरोध करत आहे आणि याठिकाणी दर्गाह व्हायला हवा अशी मागणी करत आगे. या मागणीला सर्व नागरिकांचा आणि मोहम्मद महाराजांच्या वंशजांचाही विरोध आहे.
संत शेख महंम्मद महाराज हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे हा वाद सामंजस्याने सोडवावा आणि मंदिराचा विकास व्हावा अशी भूमिका श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी मांडली आहे. ज्या महंम्मद महाराजांनी भागवत धर्म स्वीकारला ज्यांची संजीवन समाधी इथे आहे. तिथे दर्गाह होऊ देणार नाही अशी भूमिका यात्रा कमिटीचे सदस्य आणि काँग्रेसनेते घनश्याम शेलार यांनी घेतली आहे.
मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या शेख महंम्मद महाराजांच्या याच भूमीत आता वादाची ठिणगी पडली आहे. दर्गाह ट्रस्ट स्थापन केल्यानंतर हा वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. त्यामुळे यावर सामंज्यशाने तोडगा काढणं महत्वाचं आहे.