Sanjay Shirsat : शरद पवार यांच्या पक्षात लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. याआधी देखील मी भाष्य केलं असल्याचे त्याने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील जयंत पाटील हे लवकरच उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिसतील असा खळबळजनक दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
मुंबईमधील शेतकऱ्यांच्या मोर्चा वेळी जयंत पाटील यांनी केलेले विधान देखील खूप चर्चेत आले होते. अशातच आता संजय शिरसाट यांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे. याबाबत सध्या राजकीय नेते प्रश्न उपस्थित करत आहेत. जयंत पाटील हे येत्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांची साथ सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील खूप चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.
‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका…’
शक्तिपीठ महामार्गाविरोधात मुंबईत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यांच्या कुटुंबासह दाखल झाले होते. आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते देखील आझाद मैदानात दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील दाखल झाले होते. यावेळी जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना बोलताना एक खळबळजनक वक्तव्य केलं. जयंत पाटील म्हणाले की, माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय असा सवाल देखील काही जण उपस्थित करत आहेत.