Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंसोबत युती जाहीर करणार? संजय राऊतांनी केलं जाहीर, 'उद्धव यांनी इच्छेचा स्विकार...'

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची सूत्रं हातात घ्यावीत ही राज्यातील जनतेची इच्छा आहे. त्या इच्छेचा स्विकार उद्धव ठाकरेंनी केला आहे. हा भावनिक विषय असून त्यावर काय भूमिका घ्याची हे उद्धव ठाकरे आज स्पष्ट करतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.    

उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंसोबत युती जाहीर करणार? संजय राऊतांनी केलं जाहीर, 'उद्धव यांनी इच्छेचा स्विकार...'

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंचा आज मेळावा पार पडणार असून, यावेळी राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भातील काही निर्णयाची घोषणा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनीही आज उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतील असं सांगितलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची सूत्रं हातात घ्यावीत ही राज्यातील जनतेची इच्छा आहे. त्या इच्छेचा स्विकार उद्धव ठाकरेंनी केला आहे. हा भावनिक विषय असून त्यावर काय भूमिका घ्याची हे उद्धव ठाकरे आज स्पष्ट करतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.  

"आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की, मराठी माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभामिनासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करण्यास तयार आहे," असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. 

पुढे ते म्हणाले, "दोन्ही बाजूला सकारात्मक विचार आहेत. कोणीही असं होऊ नये म्हणणार नाही. रस्त्यावर जरी एखाद्याला विचारलं तरी ते सांगतील. ही लोकभावना आम्ही मराठी माणूस म्हणून ओळखू शकलो नाही तर तो महाराष्ट्रावर अन्याय ठरेल. उद्धव ठाकरे अशा विचारांचे, स्वभावाचे आहेत की ते तुटेपर्यंत ताणत नाही. त्यांच्या काही भूमिका स्पष्ट आणि परखड असतात. महाराष्ट्रावर हल्ले करण्याची प्रवृत्ती, हल्ले कऱणारे शत्रू यांच्यासोबत हातमिळवणी करायला जमणार नाही हे त्यांनी सांगितलं आहे. आणि हीच लोकभावना आहे". 

"आज शिवसेनेचा 59 वा वाढदिवस आहे हा टप्पा गाठण सोपं नसतं. एखादा पक्ष 59 वर्ष पूर्ण करतोय, हा टप्पा गाठण सोपं नाही. या प्रवासामध्ये अनेकदा संघर्ष, अडथळे, संकट या पक्षाच्या जीवनामध्ये आलं. पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना बलिदान करावं लागतं, स्वतः शिवसेने चार प्रमुखांना तुरुंगवास भोगावा लागला. असे अनेक घाव आम्ही पचवले यापुढे देखील पचवू. या काळामध्ये अनेक लोक आले अनेक लोक सोडून गेले," असं संजय राऊतांनी सांगितलं. 

"शिवसेना विरोधी पक्षात उत्तम काम करत आहे. सत्तेची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यावेळी आम्ही सत्तेत सुद्धा चांगलं काम केलं आहे. शिवसेनेचे भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आज शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि पुढील राजकीय दिशा संदर्भात सांगतील," अशी माहिती त्यांनी दिली. 

"काही हौसे नवसे माझी शिवसेना म्हणून वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांच्या जाहिराती आमच्या घरासमोर आल्या, त्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. त्यांचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे नाहीत त्यांनी अमित शहा यांचा फोटो लावावा. त्यांचे संस्थापक अमित शहा आहेत किंवा मोदी आहेत. त्यांचा वर्धापन त्यांनी गुजरात, सुरतला करावा महाराष्ट्राशी त्यांचा काय संबंध. ते करतात कारण अमित शहा यांना ते हवंय. मराठी माणसाच्या तुकडे पडावेत हे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी एसएमसी गट आहे, त्याने आनंद दिघे यांचा फोटो टाकलेला आहे. आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख नाहीत ते ठाणे जिल्हाप्रमुख होते," असंही त्यांनी म्हटलं. 

Read More