Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Maharashtra Election : निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; 5 बड्या नेत्यांची केली हकालपट्टी

Uddhav Thackeray News : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून 5 बड्या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर एवढा मोठा निर्णय घेतला आहे. 

Maharashtra Election : निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; 5 बड्या नेत्यांची केली हकालपट्टी

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जोरदार हालचाली होत आहे. या सगळ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेना पक्षातून 5 मोठ्या नेत्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार सुंत्रानी मंगळवारी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवायांसाठी पाच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. 

शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर आरोप करण्यात आले आहेत त्यापैकी एक माजी आमदार रूपेश म्हात्रे आहेत. त्यांनी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी असा दावा केला की, आपण शर्यतीतून माघार घेतली, तरीही त्याला कारवाईला सामोरे जावे लागले.

उरलेल्या निष्ठावंतांची हीच किंमत 

रुपेश म्हात्रे यांनी यावेळी म्हणाले की, “पक्षाने मला पद सोडण्यास सांगितले आणि मी सूचनांचे पालन केले, तरीही मला काढून टाकण्यात आले. पक्षाच्या वाईट दिवसात निष्ठावान राहण्याची आणि पक्षाशी टिकून राहण्याची ही किंमत आहे." महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटप व्यवस्थेनुसार समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार रईस शेख हे या मतदारसंघातून विरोधी आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील.

( हे पण वाचा - भाजपाचं धक्कातंत्र! राज्यातील 40 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; पाहा निलंबित नेत्यांची संपूर्ण यादी) 

 कोणावर कारवाई केली?

रुपेश म्हात्रे व्यतिरिक्त ज्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेने विधानसभा निवडणुकीपूर्वी कारवाई केली आहे त्यात यवतमाळ जिल्हा पक्षाचे पदाधिकारी विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे. या सर्वांची सोमवारी पक्षविरोधी कारवायांसाठी हकालपट्टी करण्यात आली.

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापुरात निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. या विधानसभा निवडणुकीचे वर्णन राज्यावर प्रेम करणारे आणि गद्दारी करणारे यांच्यातील लढत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांना राज्य आवडते ते विरोधी MVA सह संरेखित आहेत ज्यात शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचा समावेश आहे. 2022 मध्ये पक्षातील फुटीचाही यावेळी त्यांनी उल्लेख केला.

भाजपला मदत करणारे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

Read More