Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुंबईत मराठी शाळा, विद्यार्थ्यांमध्ये घट; मागच्या 13 वर्षांची आकडेवारी पाहून बसेल धक्का!

Marathi Schools in Mumbai:  महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी शाळांना घर घर लागल्याचा पाहायला मिळतंय.

मुंबईत मराठी शाळा, विद्यार्थ्यांमध्ये घट; मागच्या 13 वर्षांची आकडेवारी पाहून बसेल धक्का!

Marathi Schools in Mumbai: महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी शाळांना घर घर लागल्याचा पाहायला मिळतंय. मागील 13 वर्षांत मुंबई महापालिकेच्या 131 मराठी शाळा बंद झाल्यात. तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये तब्बल  45 टक्के घट झालीय. ही आकडेवारी मराठीच्या बाबतीच विचार करायला लावणारी आहे.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी पण मुंबईत मराठीच भाषा बोलली जावी असा आपला नेहमी आग्रह असतो. आणि ती जायलाच हवी यात दुमत नाही. मात्र राजधानी मुंबईतच मराठीला घर घर लागल्याचं पाहायला मिळतंय.मुंबईत मराठी शाळांचा टक्का घटत असताना 13 वर्षात महापालिकेच्या 131 मराठी शाळा बंद झाल्याचं वास्तव समोर आलंय.तर मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 45 टक्क्यांनी घटलीय. केवळ विद्यार्थीचं नव्हे तर या शाळांमधील शिक्षकांची संख्याही घटलीये. इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल असल्यामुळे मराठी शाळा बंद पडू लागल्यात.. 

मुंबईत मराठी शाळा आणि शिक्षकांमध्ये घट 

वर्ष            शाळा     विद्यार्थी संख्येतील घट          शिक्षकांच्या संख्येतील घट
2012-13   385       81,216       3,873
2013-14   375       69,330       3,377
2014-15   368       63,332       3,081
2015-16   350       58,637       2,812

2016-17   328       47,950       2,576
2017-18   314       42,535       2,269
2018-19   287       36,517       1,847
2019-20   283       35,181       1,721

2020-21   279       33,085       1,583
2021-22   271       34,276       1,367
2022-23   265       32,741       1,149

2023-24   262       33,739       1,011
2024-25   254       36,205         926

मुंबईत 2012-13 मध्ये मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या 385 होती.. तर विद्यार्थी संख्या होती 81 हजार 216 आणि शिक्षकांची संख्या होती 3 हजार 873.

2013-14 मध्ये शाळांमध्ये घट होत शाळांची संख्या 375 वर आली.. तर विद्यार्थी संख्या 69 हजार 330 वर पोहोचली. तर शिक्षकांची संख्या 3 हजार 377 वर पोहोचली.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय. मराठी ही मोठा सांस्कृतिक वारसा असलेली भाषा आहे. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी... आपुल्या घरात हाल सोसते मराठी अशीच काहीशी मुंबईत मराठीची अवस्था झालीय.. हिंदी इंग्रजी सारख्या भाषा मराठीवर भारी पडताना दिसताहेत. यावर धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे.. अन्यथा याचे गंभीर परिणाम मराठी सोबतच मराठी माणसालाही सोसावे लागलील.

'हिंदी कशी शिकवतात बघतोच'

हिंदी सक्तीवरून राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्याला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केलाय. महाराष्ट्रात हिंदी कशी शिकवतात बघतोच असा इशारा देखील राज ठाकरेनी सरकारला दिलाय. पहिलीपासून हिंदी शिवकण्याची कोणतीही गरज नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सरकारनं देखील पलटवार केलाय. राज्यात हिंदी अनिवार्य नसून विद्यार्थ्यांना कुठलीही भाषा शिकण्याचा पर्याय दिल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. राज्य सरकारनं जीआरमधून हिंदी अनिवार्य नसल्याचं स्पष्ट केलंय.. हिंदीऐच्छिक भाषा आहे. हिंदी व्यक्तीरिक्त इतर कोणतीही भाषा शिकण्याची मूभा विद्यार्थ्यांना असणार आहे.. तर दुसरीकडे पहिलीपासून हिंदी विषय नकोच अशी भूमिका मनसेनं घेतलीय.. दुकानात आणि शाळेत हिंदीची पुस्तकं विकू देणार नसल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय.हिंदीविरोधात राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्य सरकार कोणता निर्णय घेणार? याकडे आता लक्ष लागलंय. हिंदी अनिवार्य नसल्याचं राज्य सरकारनं सांगितलंय.. मात्र, पहिलीपासून हिंदी हा विषय नकोच अशी भूमिका मनसेनं घेतलीय.. त्यामुळे हा हिंदीचा वाद इथवरंच न थांबता अजून पेटण्याची शक्यता आहे.

Read More