अनिरुद्ध दवाळे (प्रतिनिधी) अमरावती : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अमरावती विभागात मागच्या 24 वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पाहिला तर खरंच आपण शेतीप्रधान आहोत का हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. कारण मागील 24 वर्षात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये तब्बल 21 हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
राज्यातील शेतकरी आत्महत्येसंदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. यामध्ये अमरावती विभागात मागील 24 वर्षात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचीबाब समोर आलीये. अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये 24 वर्षांमध्ये 21 हजार 286 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. निसर्गाच्या लहरीपणासोबतच शेतमालाला योग्य भाव नसल्याने शेतकरी टोकाचं पाऊल उचलत आहेत.
1. अमरावती विभागात 24 वर्षात 21 हजार 286 शेतकरी आत्महत्या
2. अमरावती विभागात अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा समावेश
3. 2024 मध्येही अमरावती विभागात सर्वाधिक आत्महत्या
4. अमरावती विभागात 2024 मध्ये 1 हजार 69 शेतकरी आत्महत्या
1. बदलतं हवामान
2. शेतीचा वाढत चाललेला उत्पादन खर्च
3. शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव
4. कर्जबाजारीपणा
एकंदरीतच शेतकरी आत्महत्येचा मुद्दा हा गांभिर्याने घेण्याची गरज आहे. सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताहेत का? याचा नव्याने आढावं घेण्याची गरज झालीय. शेतकरी आत्महत्या कशा रोखता येतील यावर सरकारकडून ठोस उपायोजना करण्याचीही गरज निर्माण झालीय.