Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ठाकरेंच्या मेळाव्यानंतर अर्ध्या तासातच सुशील केडियाची माफी

Sushil Kedia Appology: ठाकरे बंधुंच्या मेळाव्याला अर्ध्या तास झाला नसतानाही सुशील केडियाने आपला माफीनामा जाहीर केला.

ठाकरेंच्या मेळाव्यानंतर अर्ध्या तासातच सुशील केडियाची माफी

Sushil Kedia Appology From Raj Thackeray: मी 30 वर्षे मुंबईत राहून व्यवसाय करतोय पण मी मराठी बोलणार नाही, असे जाहीर आव्हान करणाऱ्या सुशील केडीया अखेर गुडघ्यावर आलाय. ठाकरे बंधुंच्या मेळाव्याला अर्ध्या तास झाला नसतानाही त्याने आपला माफीनामा जाहीर केला. काय म्हणाले सुशील केडीया? जाणून घेऊया.

केडीयांचा माफीनामा 

माझं ट्विट हा चुकीच्या मनस्थितीत, दबावाखाली आणि तणावाखाली झाला होता. त्यानंतर तो ट्विट लोकांकडून हाताळला गेला आणि चुकीच्या पद्धतीने व्याख्या करण्यात आली, ज्यामुळे वाद निर्माण झाला.  मराठी न जाणणाऱ्यांवर हिंसा होत असल्याने त्यांनी ओव्हररिऍक्ट केले. त्यामुळे त्यांनी त्यांचे ओव्हररिऍक्टिंग मागे घेण्याचे ठरवले, हे त्यांनी मान्य केले. 30 वर्षे मुंबईत राहूनही मला मराठी भाषेची जितकी प्रावीण्यता आणि स्पष्टता मराठी भाषिक लोकांमध्ये असते, तितकी प्राप्त होऊ शकली नाही. त्यामुळे मी मराठी भाषा फक्त अनौपचारिक वातावरणात आणि जवळच्या लोकांसोबत वापरली. भयाचे वातावरण असल्याने मराठी भाषेचा वापर करताना अनावश्यकपणे चुका होण्याची शक्यता असते, ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले. 

मी राज ठाकरे यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि कृतज्ञता बाळगली असल्याचे त्याने सांगितले. विशेषत: हनुमान चालीसा मोहीम, हिंदुत्व आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यांवर त्यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले.त्यांनी आपली चूक मान्य केली आणि राज ठाकरे यांच्याकडे दयेची अपेक्षा व्यक्त केली. माझे ट्विट हतबलतेतून आणि तणावातून आले होते, परंतु त्यांनी नेहमीच राज ठाकरे यांच्याबद्दल सकारात्मक विचार व्यक्त केले आहेत.भविष्यातील आशा: त्यांनी आशा व्यक्त केली की, मराठी भाषेचा वापर करण्यास भीती नसावी, ज्यामुळे भाषेची प्रावीण्यता वाढेल, असेही ते म्हणाले.

केडीयाचं कार्यालय फोडलं 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशील केडियाचं ऑफिस फोडण्यात आलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक करत सुशील केडियाच्या वरळीतील ऑफिसची तोडफोड केली आहे. सुरक्षारक्षकांनी मनसे कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाचं उपरणं होतं. तोडफोड केल्यानंतर कार्यालयाबाहेर तणावाचं वातावरण आहे. महत्त्वाचं म्हणजे वरळीतच राज आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडत असून येथे कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांनी तुफान गर्दी केली आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?

अमराठी व्यावसायिकाला मारहाण केल्यानंतर सुशील केडिया यांनी एक्सवर वादग्रस्त पोस्ट केली होती. यात राज ठाकरेंचा त्यांनी एकेरी उल्लेख केला होता. "राज ठाकरे याची नोंद घ्या की, मागील 30 वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता तुमच्या अती गैरवर्तनामुळे मी निश्चित केलं आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत आहे तोपर्यंत मराठी शिकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे बोल?".

संजय राऊतांनी केली होती टीका

जय राऊत म्हणाले होते की, "त्यांची टोकाची भूमिका माझ्या कानावर आली आहे. त्यांनी राज ठाकरेंना जे आव्हान देण्याचा प्रयत्न केला ते मी पाहिलं आहे. महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शाह यांच्या राजकारणामुळे वाढली आहे. आज जो जय गुजरातचा नारा दिला त्यामुळे केडियासारख्या लोकांना बळ मिळतं. मराठीविरोधात अशी भूमिका घेती यावी यासाठीच तर अमित शाह यांनी शिवसेना फोडली". 

आग्रह करु शकतो दुराग्रह नाही - देवेंद्र फडणवीस

"महाराष्ट्रात राहून मराठी शिकण्याचा आग्रह करु शकतो दुराग्रह नाही. मी उद्या तामिळनाडूत गेल्यानंतर कोणीही मला तामिळ शिकली पाहिजे म्हणजे दुराग्रह करु शकत नाही. मला तामिळ भाषा आवडते, पण दुराग्रह करु शकत नाही. मला जर मराठीत बोलायचं असेल तर मराठीत बोलीन. पण मला जर तिथे कोणी दुराग्रह केला तर ते योग्य असेल का? आपण एका देशात भारतात राहतो. बाजूचे राज्य, भाषा काही पाकिस्तान नाही. मराठी माणूस इतकी संकुचित मनोवृत्ती ठेवू शकत नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मराठीचा अपमान सहन करु शकत नाही - योगेश कदम

"महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमानदेखील झाला नाही पाहिजे हे लक्षात ठेवायला हवं. महाराष्ट्रात राहताय, व्यवसाय़ करताय तर मराठीचा अपमानसहन करु शकत नाही. दोन्ही गोष्टी एकत्र चालत असता. मराठी, हिंदी विषयावर जे काही राजकारण सुरु आहे तो पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल," असं योगेश कदम म्हणाले आहेत.

Read More