Uddhav Thackeray On Shivsena Foundation Day : भाजपत मोठ्या प्रमाणात इमकमिंग होत आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पातळात गेले, आकाशात गेले की भाजपत गेले? पर्यटकांवर गोळ्या घालणारे दहशवादी गेले कुठे? असं म्हणत पहगाल मध्ये झालेल्या हल्ल्याचा उद्धव ठाकरे यांनी विषेध केला. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुंबईत मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
जे आपला बाप बदलतात. त्यांना राजकारणात पोरं होत नाहीत. अशी लोकं आमच्या घराणेशाहीवर टीका करतात. शिवसेना वर्धापनदिनी सोहळ्यात ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली. शिवसेना स्थापन झाली तेव्हा दाढी खाजवणारे कुठे होता माहिती नाही. सर्व चोरांचा बाजार आहे. भाजपाची पाळलेली बेडकं डराव डराव करत आहेत.
हे वातावरण कुणाच्या नशिबात नाही. ही माझी पुण्याई नाही. पुर्वजांची आहे. एवढं करून पक्ष संपत नाही असा त्यांना प्रश्न पडत असेल. पैसे फेकून जमवलेली माणसे नाहीत. महाराष्ट्रधर्म पाळणारी ही माणसे आहेत पैसा फेको तमाशा देखो...तिकडे चोरांचा बाजार आहे अशी टीका शिंदेंवर केली. यांचे सरकार आल्यावर पनवती लागलीय. कामांची वाट लागलीय. अपघातात लोक जातायत त्याची जबाबदारी कोण घेणार. पंतप्रधान देशाचे आहात की भाजपचे. आम्ही इंडिया आघाडीसोबत गेलो तेव्हा आमची इंडियन मुजाहिद्दीन सोबत तुला केली. मग आमचे खासदार जगभरात कशाला पाठवले. संकट आल्यावर आमचे खासदार पाठवता असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.