Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'राज-उद्धव एकत्र येणार' असं ऐकताच एकनाथ शिंदे पत्रकारांसमोर हात जोडून म्हणाले, 'आमची...'

Thackeray Brother Alliance Eknath Shinde Reacts: ठाकरे बंधू एकत्र येणार यासंदर्भातील चर्चांना बळ देणारं विधान उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

'राज-उद्धव एकत्र येणार' असं ऐकताच एकनाथ शिंदे पत्रकारांसमोर हात जोडून म्हणाले, 'आमची...'

Thackeray Brother Alliance Eknath Shinde Reacts: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांच्या पक्षाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती होईल असे संकेत देणारं विधान केलं. मागील अनेक दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीसंदर्भात राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरेंचं विधान या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब करणारं असल्याची चर्चा आहे. असं असतानाच दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

शिंदे-मनसे जवळीक अन् पुन्हा 'जैसे थे'

राज ठाकरेंच्या पक्षासोबत युती करण्याचा आणि जवळीक साधण्याचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकदा त्यांची आणि राज ठाकरेंची भेट झाली. बऱ्याच वेगवेगळ्या विषयांच्या निमित्ताने दोन्ही नेते भेटत राहिले. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मनसेला महायुतीत घेण्यासाठी शिंदे प्रयत्नशील होते अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या. काही आठवड्यांपूर्वीच शिंदेंच्या पक्षाचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दुसरीकडे मनसेची शिंदेंचा मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीशीही जवळीक वाढल्याचं दिसून आलं. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व मतदानावर शंका उपस्थित केल्याने पुन्हा परिस्थिती 'जैसे थे'वर आली.

ठाकरेंच्या 'या' विधानाने युतीच्या चर्चांना बळ

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने आता सर्वच पक्ष युती, आघाडीसंदर्भात चाचपणी करताना दिसत आहेत. त्याच दोन्ही ठाकरे बंधू मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येतील अशी जोरदार चर्चा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम दिसून येईल असंही सांगितलं जात आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी मनसेसोबतच्या युतीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, "महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल" असं सूचक विधान केलं आहे. मनसेकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच दोन्ही पक्ष काहीतरी मोठी घोषणा करतील अशी जोरदार चर्चा ठाकरेंच्या या विधानानंतर सुरु झाली आहे. 

नक्की वाचा >> दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास शिंदेंचा 'टप्प्यात कार्यक्रम' निश्चित? भाजपाही सोडणार साथ?

शिंदे हात जोडून म्हणाले...

ठाकरेंनी 'महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल' असं म्हटल्याचा संदर्भ देत एकनाथ शिंदेंना पुण्यातील 'क्रेडाई'च्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर पुण्यात पत्रकारांनी हा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकल्यानंतर एकानाथ शिंदेंनी हात जोडले. त्यानंतर त्यांनी, "आमची महायुती मजबुतीने लढणार आणि मजबुतीने जिंकणार" असं म्हणत पत्रकारांसमोरुन काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं. 

Read More