औरंगजेब पवित्र व्यक्ती होती. टोपी शिवून औरंगजेबनं आपला उदरनिर्वाह केला. औरंगजेब सर्वधर्म समभावाचा पुरस्कर्ता होता, अशी मुक्ताफळं माजी आमदार आसिफ शेख यांनी उधळली आहेत. केवळ राजकारणासाठी औरंगजेबचं नाव घेऊन त्याला बदनाम केलं जात असल्याचा आरोपही आसिफ शेख यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मालेगावात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.