Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मिळणार 10 टक्के सवलत, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेला स्मार्ट मीटर नक्की काय?

Smart Meter: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्मार्ट मीटरचा उल्लेख केला. 

महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मिळणार 10 टक्के सवलत, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेला स्मार्ट मीटर नक्की काय?

Smart Meter: गेल्या वर्षभरात स्मार्ट मीटर हा राज्यात चर्चेचा विषय राहिला आहे.मोबाईल रिचार्ज प्रमाणे वीज बिलाचंही रिचार्ज करता यावे या उद्दीष्टाने स्मार्ट मीटर सुरु करण्यात आले. महावितरणकडून अनेक ठिकाणी हे मीटर लावण्यात आले. पण यानंतर वीज बील वाढल्याच्या तक्रारी समोर आल्या. ठाकरेंच्या शिवसेनेने स्मार्टमीटरला कडाडून विरोध केला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्मार्ट मीटरचा उल्लेख केला. ग्राहकांना यात सवलत देण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. नेमकं स्मार्ट मीटर काय प्रकार आहे? याला विरोध का होतोय? सविस्तर जाणून घेऊया.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर लावणं बंधनकारक असणार आहे. घरगुती ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावावं, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विधानसभेतील आपल्या भाषणात ते स्मार्ट मीटरविषयी बोलले.घरगुती ग्राहकांनी प्रीपेड मिटर लावू नये, असेही ते यावेळी म्हणाले. दिवसा वापरणाऱ्या वीजेवर 5  वर्षात 10 टक्के सवलत देऊ, असे आश्वासनही फडणवीसांनी यावेळी सरकारच्यावतीने दिले. 

काय आहे स्मार्ट मीटर?

सध्याच्या पद्धतीत वीजग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते आणि त्यानुसार बिल पाठविले जाते. मात्र प्रीपेड मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना मोबाईल रिचार्ज प्रमाणे वीज बिलाचंही रिचार्ज करावं लागणार आहे. वीजेच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसंच ग्राहकांचा वीज वापराचा खर्च निश्चित करण्यासाठी हे नवे मीटर बसवले जात असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. महावितरणाच्या 41 लाख ग्राहकांपर्यंत मीटर बसवत असल्याचेही महावितरणने म्हटले होते. 

स्मार्ट मीटरला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध का?

महावितरण कंपनीने राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर लावणार तसेच हे मीटर कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी आणि चुकीची जाहिरात केली आहे.या संबंधातील टेंडर्स मंजूर करण्यात आलेली आहेत व लवकरच सर्वत्र मीटर लावण्याची मोहीम सुरू होईल असे स्पष्ट दिसून येत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. वास्तविक हे मीटर मोफत देऊन वीज ग्राहकांची फसवणूक केल्याची भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतली आहे. मुंबईतील अदानी स्मार्ट मीटरला ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केलाय. या स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात भरमसाट वाढ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यामुळे नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेता अदानींसोबत हा स्मार्ट मीटरचा करार रद्द करावा. अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी विधानसभेत केली होती. अदानी इलेक्ट्रिसिटी संदर्भात अनेक तक्रारी ग्राहकांकडून मिळत असल्याने आमदार अनिल परब म्हणाले होते. स्मार्ट मीटर लावण्याचं काम अदानी इलेक्ट्रिसिटीकडून केले जात आहे आणि हे स्मार्ट मीटर म्हणजे लोकांना लुटण्याचं काम असल्याची टीका त्यांनी केली.

Read More