छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी. आजचा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांचा अमानुष छळ केला. या छळानंतर 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या धर्मासाठी असंख्य यातना भोगल्या आणि बलिदान दिलं.
ृछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 साली पुरंदर गडावर झाला. त्यांचा जन्म झाला आणि सईबाई या आजारी पडला. अगदी तान्हे असल्यापासूनच संभाजी महाराजांचा संघर्ष सुरुच झाला. संभाजी महाराज लहान असतानाच त्यांची आईचे सईबाईंचे निधन झाले. अगदी बालपणी आई गमावल्यानंतर बाळाला दूध मिळणे कठीण झाले.
यावेळी जिजाऊंनी पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ गावच्या धाराऊ यांना निरोप पाठवला. यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आपलं दूध पाजलं. दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारली, त्यामुळे त्या 'दुधआई' म्हणून ओळखल्या गेल्या.
पुण्याजवळील भोर मावळातल्या कापूरहोळ गावातील एका कुलवंत मराठा कुटुंबातील धनगर कुटुंबातील त्या स्त्री होत्या. त्या तुकोजी गाडे पाटील यांच्या पत्नी होत्या. संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर त्यांनी बाळ शंभूराजे यांचे संगोपन केले. नुकत्याच बाळंत झालेल्या धाराऊंनी पोटच्या मुलासोबत शंभू राजांना दूध पाजले.
छज्ञपती शिवाजी महाराजांनी या कृतज्ञेची जाणीव म्हणून धाराऊंना दरवर्षी 16 होणाची तैनाती करुन दिली. एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेतही घेतले.
धाराऊ यांनी संभाजी महाराजांना दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारली, त्यामुळे त्या 'दुधआई' म्हणून ओळखल्या गेल्या. त्यांच्या नावाचा उल्लेख संभाजी महाराजांच्या बालपणीच्या कहाण्यात वारंवार केला जातो.
छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आजही कापूरहोळ या गावात राहतात.
धाराऊ यांच्या वंशजांनी त्यांच्या घराची आणि स्मारकाची व्यवस्थित देखरेख ठेवली आहे.
काही वर्षांपूर्वी, या स्मारकाची दुरुस्ती करण्यात आली.