Marathi News> मराठवाडा
Advertisement

लग्न होत नाही म्हणून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा दावा, पोलीस म्हणाले- चौकशी करणार!

एकेकाळी उत्तम शेती म्हटला जाणारा शेती व्यवसाय आस्मानी आणि संकटामुळे अधोगतिकडे जात आहे. त्यामुळे लग्न जुळवताना आता शेतकऱ्यांना आता कारभारीन मिळणं कठीण झालं आहे.  

लग्न होत नाही म्हणून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा दावा, पोलीस म्हणाले- चौकशी करणार!

Hingoli Crime : हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील तांबोळी गल्लीत राहत असलेल्या 30 वर्षीय गजानन व्यवहारे नावाच्या शेतकरी तरुणाने स्वतःला गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे.  गजाननच्या आत्महत्या मागचं कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. लग्न जुळत नसल्याने गजाननने आत्महत्या केलीय. 30 वर्ष ओलांडली तरी सुद्धा आपलं लग्न जमत नसल्याने तो नैराश्यात सापडला होता. पण तो शेती करत असल्यामुळे त्याला सोयरिकी येत नसल्याने त्याने असे टोकाचे पाऊल उचलले. 

पोलीस निरीक्षक मोहन भोसले काय म्हणाले? 

पाहणी केली असता त्याने एका झाडाला गळफास घेतला होता. त्याठिकाणी त्याचे वडिल आणि चुलते त्यासोबतच गावकरी देखील उपस्थित होते. त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, लग्न होत नसल्यामुळे त्यांने आत्महत्या केली आहे. खंडू व्यवहारे यांनी तक्रार दाखल केली असून सध्या आम्ही कलम 194 नुसार खरच त्या मुलाने लग्न न झाल्यामुळे आत्महत्या केली का याची पडताळणी करणार असल्याच पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी सांगितले. 

अविवाहित तरुणांचा हा मुद्दा मराठवाडा आणि विदर्भात गंभीर बनलाय. सरकारी नौकरी असलेल्या मुलांना सहज सोयरिकी येतायत. हिंगोली जिल्ह्यातील 700 गावात 20 हजारपेक्षा अधिक मुलांची लग्न मुलगी मिळत नसल्याने ताटकळली आहेत. मयत गजानन व्यवहारेकडे दोघा भावांमध्ये 7 एकर शेती आहे. गावात बांधलेले घर आहे. सुशिक्षित आहे. गावात घराची प्रतिष्ठा आहे. घरी ट्रॅक्टर मळनियंत्र असून मयत गजानन शेती बरोबर ट्रॅक्टर,मळनियंत्राचा देखील व्यवसाय करायचा. तरी ही त्याला सोयरिक येत नसल्याने त्याने आपलं जीवन संपवलं. सततची नापिकी, उत्पादनापेक्षा वाढलेला उत्पादन खर्च, शेती उपदानाला मिळत नसलेला भाव यामुळे मुलीच्या वडिलांच्या आणि मुलींच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलाला नौकरी असावी, शहरात घर असावं, गावात शेती असावी, छोटं कुटुंब असावं अश्या सध्याच्या मुलींच्या अपेक्षा आहेत. यामुळे शेतकरी मुलांचे लग्न हा नवीन सामाजिक प्रश्न निर्माण होऊ लागलाय.

तरुणांच्या लग्नाच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष द्यावे ; जयंत पाटील

शेतकरी, शेतमजुर, छोटे मोठे उद्योजक असलेल्या मुलांची हीच परिस्थिती आहे. पण नोकरदार मुलांना मात्र मोठी मागणी आहे. पूर्वी ग्रामीण भागामधील तरुण विवाह नोंदणी केंद्रामध्ये नोंदणी करीत नव्हते. शिवाय वधू वर परिचय मेळावे ही घेण्याची आवश्यकता पडत नव्हती. महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलीचं लिंग गुंणोत्तर प्रमाण हजारामागे 929 इतकं झालय. सोलापुरात नवरदेवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून लग्नाला मुलगी देण्याची मागणी केली होती. सातारा, बुलढाणा, हिंगोली आणि परभणी येथे यापूर्वी लग्नाला मुलगी मिळत नसल्याने आत्महत्या केल्या होत्या. दिवसेनदीवस ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा सामाजिक प्रश्न अधिक मोठा होत चालल्याने सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालीय अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलीय. 

Read More