Abu Azmi Controversy: मनसेवर टीका करताना समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी बरळलेत. मराठीचा मुद्दा हा काय मुद्दा आहे का? असं अबू आझमी म्हणालेत. मनसेचे नेते मराठीच्या मुद्द्यावरुन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.. मराठीचा सन्मान करा मात्र हिंदीचा अपमान करु नका असंही ते यावेळी म्हणालेत. सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलाताना त्यांनी हे विधान केलंय.
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. मनसेवर टीका करताना ते बरळले आहेत. राज आणि उद्धव एकत्र येण्यावर ते म्हणाले, एकाच घरात जन्माला आले असतील तर एक साथ राहो त्यात आम्हालाही आनंद आहे.राज ठाकरेंची काही ताकद नाही ते फक्त द्वेशाच राजकारण करतात. राज ठाकरे हे दररोज हिंदी किंवा उत्तर भारतीय विरोधात, मराठी आणि हिंदी विरोधात बोलणे हाच त्यांचा धंदा आहे. राज उद्धव एकत्र आले तर शिवसेनेची ताकद कमी होऊ शकते असा दावा आबू आझमी यांनी केला*
संसदेत एक कमिटी आहे. भाषेच्या नावावर 45 मेंबर आहेत ते भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. केंद्र सरकारचे पूर्ण काम हिंदीतून असतं. महाराष्ट्रात जर तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदी मराठी असली पाहिजे. दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्लिश असायला पाहिजे. महाराष्ट्र जर तिसरी भाषा हिंदी नसेल तर तुम्हीच सांगा कोणती भाषा पाहिजे? असा प्रश्न त्यांनी विचारला.
बाळा नांदगावकर हे जनतेची दिशाभूल करतायत. जनतेत असं बोलून फक्त मतदान घेतात. मनसेचे 14 आमदार आले होते आता ते झिरो झाले आहेत. माझे शिक्षण इथे झाले नाही तरी मी मराठीसाठी प्रयत्न करतो.. तरीपण मी मराठीची इज्जत करतो. मराठीचा सन्मान झाला पाहिजे पण हिंदीचा अपमान झाला नाही पाहिजे, असेही ते म्हणाले.
शरद पवार एक मोठे नेते आहेत. शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली ती फक्त ईडी आणि इन्कम टॅक्स यांच्यामुळे सोडल्याचे ते म्हणाले.
यावेळी अबू आझीमींना मराठीच्या मुद्द्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, मराठीचा मुद्दा काय असतो? फालतू गोष्टी करता. महाराष्ट्रत राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणाचीच मराठीचा द्वेश करत नाही. एक भाषा अशी असली पाहिजे कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत याचा सन्मान झाला पाहिजे. एक राज्यातल्या भाषेचाही सन्मान झाला पाहिजे, असे ते म्हणाले.