Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईकरांसाठी 'बेस्ट' न्यूज, बेस्टचा प्रवास झाला स्वस्त

बेस्टने प्रवास करणं झालं स्वस्त

मुंबईकरांसाठी 'बेस्ट' न्यूज, बेस्टचा प्रवास झाला स्वस्त

मुंबई : मुंबईकरांसाठी बेस्टने खुशखबर दिली आहे. बेस्टमधून फिरणं आता स्वस्त झालं आहे. कारण बेस्टचं किमान तिकीट ५ रुपये करण्यात आलं आहे. बेस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या बेस्टचे किमान भाडे आठ रुपये असून ते पाच रूपये करण्यात आलं आहे. तर एसी बसचे किमान भाडेही आता ६ रूपये करण्यात आलं आहे.

आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बेस्टला मुंबई महापालिकेनं काही अटींवर आर्थिक मदत देऊ केली आहे. तसंच भाडे कमी करून प्रवासी संख्या वाढण्यास्तव आर्थिक मदत देणार आहे.

बेस्टचे नवे दर

५ किमीपर्यंत - ५ रुपये

१० किमीपर्यंत - १०रुपये

१५ किमीपर्यंत - १५ रुपये

१५ किमीच्या पुढे - २० रुपये

दैनिक पास - ५० रुपये

Read More