नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारला सर्कस म्हणून संबोधणाऱ्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड उत्तर दिले आहे. रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असा पलटवार राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
महाराष्ट्र में लोकतांत्रिक ढंग से चलने वाली सरकार अच्छा काम कर रही है
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) June 9, 2020
Covid 19 को लेकर ICMR ने मुम्बई मॉडल की प्रशंशा की है
केंद्रीय मंत्री @rajnathsingh जी रिंग मास्टर के हंटर से चलने वाली सरकार के मंत्री लोकतांत्रिक ढंग से चलने वाली सरकार को सर्कस बोल रहे हैं।
"अनुभव के बोल "
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला होता.
महाराष्ट्र की प्रदेश सरकार तीन दलों की सरकार है। लगता है सरकार के नाम पर सर्कस हो रहा है। विकास का जिस प्रकार का विजन महाराष्ट्र सरकार के पास होना चाहिए वह नहीं है। जबकि केंद्र सरकार हर सम्भव सहायता दे रही है।
— Rajnath Singh (@rajnathsingh) June 8, 2020
महाराष्ट्रातलं सरकार हे तीन पक्षांचं सरकार आहे. हे सरकार पाहून असं वाटतं की सरकारच्या नावाने सर्कस सुरु आहे. केंद्र सरकार प्रत्येक बाबतीत मदत करत असले तरी विकासाचं व्हिजन जसं असायला हवं तसं महाराष्ट्र सरकारकडे नाही, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली होती.
जब महाराष्ट्र में चुनाव लड़ना हुआ तो भाजपा और शिवसेना का गठबंधन हुआ। लेकिन गठबंधन के बाद सत्ता की हवस में भाजपा को धोखा दिया गया।
— Rajnath Singh (@rajnathsingh) June 8, 2020
मैं भाजपा के चरित्र को स्पष्ट करना चाहता हूं कि-
हम धोखा खा सकते हैं, लेकिन धोखा कभी दे नहीं सकते हैं।यह भाजपा का चरित्र रहा है।
राजनाथ सिंह यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. जेव्हा महाराष्ट्रात निवडणूक लढवली गेली तेव्हा शिवसेनेनं भाजपबरोबर निवडणूक लढवली. पण शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटी भाजपला धोका दिला, असं राजनाथ म्हणाले. भाजप धोका खाऊ शकतो, पण धोका देणार नाही, हेच भाजपचं चरित्र आहे असं राजनाथ सिंह म्हणाले.
राजनाथ यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चाललेलं सरकार चांगलं काम करत आहे. कोविड १९ च्या बाबतीत आयसीएमआरने मुंबई मॉडेलची प्रशंसा केली आहे, असं मलिक म्हणाले. रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असं उत्तर मलिक यांनी दिले आहे.