Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

तुरुंगात असतानाही त्यावेळी राज्यपालांविरोधातील लेख कसा आला? जेलर हैराण; राऊतांनी केला खुलासा!

MP Sanjay Raut: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे अनावरण नुकतेच झाले.

तुरुंगात असतानाही त्यावेळी राज्यपालांविरोधातील लेख कसा आला? जेलर हैराण; राऊतांनी केला खुलासा!

MP Sanjay Raut: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे अनावरण नुकतेच झाले. यावेळी त्यांनी तुरुंगातील आठवणी आणि पुस्तकाच्या प्रक्रियेवर भाष्य केले. यावेळी जावेद अख्तर, शरद पवार, साकेत गोखले असे मान्यवर उपस्थित होते. जिथे चुकीचं काही होतं तिथे जावेदसाहेब आवाज उठवत असतात. शरद पवारांशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाही. ते पडद्यामागे आमच्यासाठी लढाया लढत असतात आणि पुढे येऊनदेखील लढतात. उद्धव ठाकरे माझे मित्र नेहमी माझ्यासोबत असतात. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार साकेत गोखले हे महाराष्ट्रातील लढवय्ये आहेत. मी त्यांच्यात माझी प्रतिकृती पाहतो. कारण तेदेखील ईडीमुळे तुरुंगात होतो. शरद तांदळे यांनी हिंमत्तीचे काम केलंय. ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा. पण ईडीचं बुच मी लावून ठेवलंय. यापुढे कोणाला त्रास होणार नाही. मी शेवटचा माणूस होतो, असे संजय राऊत म्हणाले. इथे असलेल्या प्रत्येकाने मला, माझ्या कुटुंबाला नैतिक पाठबळ दिल्याचे राऊत म्हणाले.  

पुस्तकावर चर्चा सुरु आहे. संपादकीय लिहितो तेव्हा चर्चा होते त्यामुळे पुस्तकाची चर्चा नाही झाली तर उपयोग काय? चर्चा तर झालीच पाहिजे. जे लिहिलंय ते सत्य आहे. माझी ओळख बाळासाहेबांमुळे झाली. सत्य आणि नितीमत्तेची कास सोडू नको,असे त्यांनी मला सांगितले. 

आम्ही वाकणार नाही. काही झालं तरी जुलमी शासनव्यवस्थेच्या रणगाड्यासमोर झुकायचे नाही. हे पुस्तक मी तुरुंगात लिहायच ठरवलं तेव्हा मी देशमुखांनाही सांगितलं. तिथल्या दरवाजात वाकून जाव-यावं लागत. तुमचा जगाशी संबंध पूर्ण तुटतो. दगडाच्या भींती बघायच्या आणि दिवस काढायचे. लिहिणं, वाचणं, चांगले विचार करायचे. एखादा सुटला तर त्याचे जजमेंट घेऊन अभ्यास करायचो. तुरुंगातले लोक बॅरीस्टर बनून बाहेर पडतात. 8 दिवस तुरुंगात राहिला तर पीएचडी करतो, असे राऊत म्हणाले. 

आम्ही ज्या आर्थर रोड तुरुंगात होतो तिथे मी म्हटलं ससे कुठून आले. तर ते उंदीर असल्याचे सांगितले. देशमुखांनी त्यांना नाव ठेवली होती. पण आता आपण मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे म्हणत त्यांनी बोलणे टाळले. सामनाचे संपादकीय यायचे, दैनिक निघायचं, लढाई सुरुच होते. माझ्यासारखा माणूस कधी खचत नाही. आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे राऊत म्हणाले. 

ईडीच्या कोठडीत असताना सरकारवर भयंकर टीका करणारं संपादकीय प्रसिद्ध झाले. त्यावेळी मी राज्यपालांवर लिहिले होते. त्यावेळी माझे स्टेटमेंट घ्यायला आले. मी आधीच लिहून आलो होतो. हा घाण करणार मला माहिती होतं, असे ते म्हणाले. 

80 टक्के पुस्तक तुरुंगात तयार झालं. बाकीचे 20 टक्के व्हायला 2 वर्षे लागले. कसाबचं बराक जयंत पाटलांनी बनवलं. त्यात आम्ही राहिलो. कसे होते बराक? मीच बनवले,अशी मजेशीर आठवणदेखील पुस्तकात असल्याचे ते म्हणाले. पुस्तकात रडगाणं नाहीय. गेलो तुरुंगात आणि आलो परत. ज्याने मला पकडलं त्याला पश्चाताप झाला. आम्ही तुरुंगात जायला नाही घाबरत. देशाला अशा लोकांची गरज असल्याचे राऊत म्हणाले. 

पुस्तक राजतीय आहे. ज्याला विरोधी पक्षात राहून काम करायचंय त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. महाराष्ट्र गा... नाहीय. हा या पुस्तकाचा सार आहे. आजही मी कोर्टात जातो. जजसमोर उभा राहतो. हुकूमशाह कधीपर्यंत हुकूमशाही करणार? त्यालाही जमिनीत गाडलं जातं, असे राऊत म्हणाले. काही लोकांनी महाराष्ट्राचा नरक झालाय. पण याचा स्वर्ग होईल, असे ते म्हणाले.

Read More