Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'मेलेल्याला काय मारणार?' 'कमॉन किल मी' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदेंनी डिवचलं!

Eknath Shinde: मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार ते काय होणार बाळासाहेबांच्या खुर्चीचे वारसदार, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

'मेलेल्याला काय मारणार?' 'कमॉन किल मी' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदेंनी डिवचलं!

Eknath Shinde: बाळासाहेबांचं विचार आपण जपला म्हणून आपली विजयी घोडदौड सुरु असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ठाकरेंच्या शिवसेनेने ज्या जागा जिंकल्या त्या कॉंग्रेसच्या वोटबॅंकवर. मतदारांनी उबाठाला केव्हाच टाटा बाय बाय केलंय. आपल्याकडे आत्मविश्वास आहे. त्यांच्याकडे अहंकार आहे. अहंकारी लोकांचा फणा लोकांनी ठेचण्याचे काम केलंय, महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे. बाळासाहेबांनी ज्याला आयुष्यभर विरोध केला त्यांच्याच दावणीला शिवसेना बांधली, सत्तेसाठी लाचारी पत्करली. शिवसेनेच्या मतदारांचा विश्वासघात त्यांनी केला. मराठी माणसांचा विश्वासघात त्यांनी केला. असा विश्वासघातकी माणसू कोणी पाहिला नाही, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.

मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार ते काय होणार बाळासाहेबांच्या खुर्चीचे वारसदार. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा हक्क गमावला पण हिंदुत्व सोजले नाही.  बाळासाहेब असते तर खुर्चीसाठी लाचार लोकांना उलट टांगून मिर्चीची धुरी दिली असती. 'युती करता का माझ्याशी' असे विचारायची वेळ आली. बाळासाहेबांचा विचार सोडल्याने, सत्तेचा मोह केल्याने ही परिस्थिती आल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 

रक्तात शेवटचा थेंब असेपर्यंत हिंदुत्वाशी प्रतारणा होणार नाही, हे वचन आम्ही दिलंय. काही लोकांना निवडणुका आल्यावर लोकांची आठवण येते. मराठी लोकं आठवतात. मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवतील. बाळासाहेबांनंतर मराठी माणसांसाठी काय केलं? याचा हिशोब द्या. तुमच्या नाकर्तेपणामुळे मुंबईतला मराठी माणूस विरार, नालासोपारा गेला. गेली 20 वर्षे मुंबईत कोणाची सत्ता होती हे सर्वश्रृत आहे. हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मग शिवसेनाप्रमुखांना हिंदुहृदयसम्राट म्हणायला तुमची जीभ कचरते का? असा प्रश्न शिंदेंनी विचारला.

मेलेल्याला काय मारणार?

मेलेल्याला काय मारणार? महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत तुमचा मुडदा पाडलाय. नुसताच करुन शोर मनगटात येत नाही जोर. वाघाचं कातडं पांघरुन लांडगा वाघ होत नाही. नुसत्या तोंडाच्या वाफा सोडून चालत त्यासाठी मनगटात जोर लागतो. तो या माझ्या शिवसैनिकांच्यात आहे. तुमचा टांगा पलटी घोडे फरार करुन टाकले आम्ही. धर्मवीर आनंद दिंघेंच्या तालमीतले हे लोकं आहेत हे बाळासाहेबांनी भाषणात सांगितलं.

Read More