Marathi News> उत्तर महाराष्ट्र
Advertisement

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नांदेडच्या भोकर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट, पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती

मार्च महिना सुरु होताच नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. विहिरींनी तळ गाठल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती. 

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नांदेडच्या भोकर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट, पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती

Nanded Water Crisis : मार्च महिन्यातच नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा लागायला सुरुवात झाली आहे. भोकर तालुक्यातील अनेक गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठशे लोकसंख्या असलेल्या जाकापूर गावाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. गावातील विहिरीनी तळ गाठला असून थेंबभर पाणी शेंदण्यासाठी विहिरीच्या पाझरातून पाणी येण्याची तासोनतास वाट पाहावी लागत आहे. जाकापूर तांड्यावरील विहिरीनेही तळ गाठला असून विहिरीतील गढूळ पाणी घेण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 

गेल्या महिनाभरापासून जाकापूर गावात हीच परिस्थिती आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनीही महिनाभरापूर्वी गावात येऊन पाणी टंचाईची खरी परिस्थिती पाहिली होती. गावाने टँकरची रितसर मागणीही केली पण अजून एकही टँकर सुरु करण्यात आले नाही. शेतातील विहिरीत किंवा जिथे शेतात बोअरला पाणी आहे तिथून ग्रामस्थाना पाणी आणावे लागत आहे. पिण्यासाठीही थेंबभर पाणी नसल्याने तात्काळ टँकर सुरु करण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे. 

महिन्याभरापासून पाणीटंचाईचे संकट

मराठवाड्यात दरवर्षी प्रमाणे पाण्याची टंचाई पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार यंदा देखील आतापासूनच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्याची सुरुवात होताच नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईच्या संकट आले आहे. अनेक गावातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची टंचाई सुरु झाली आहे. यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस पडल्यानंतर यावर्षी पाणी टंचाई भासणार नाही असं म्हटले जात होते. मात्र, नांदेड जिल्ह्यात आतापासूनच पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. 

गावापासून दर असणाऱ्या विहिरीवरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये काही वयोवृद्ध महिला देखील आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. मात्र, थोडे थोडे झऱ्यातून येणारे पाणी नागरिकांना भरावे लागत आहे. विहिरीतील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

Read More