मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघर जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
रविवारी मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला होता या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोनच दिवसांत पुन्हा याच महामार्गावर अपघात झाला असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघरजवळ हा भीषण अपघात घडला आहे. मालवाहतूक ट्रकला, बस व पाठीमागून येणाऱ्या एकूण चार गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत.
पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. या अपघाता तीन जण जागीच मृत्यू झाले असून जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले
अपघात इतका भीषण होता की यात अपघातग्रस्त वाहनांचा अक्षरशः चक्कनाचुर झाला आहे. बसच्या काचा तुटल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अपघातामुळं मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.