रात्रीच्या जेवणानंतर 'या' 3 चुका ठरु शकतील घातक; आजारांनाही मिळेल आमंत्रण
धकाधकीचे आयुष्य आणि बदलती जीवनशैली याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. शरीराला योग्य पोषण न मिळाल्याने कमी वयातच अनेक आजारांचा सामना करावा लागतो. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी जेवणात सकस आहार घ्यावा. त्यानंतर जेवण झाल्यानंतरही काही गोष्टी कटाक्षाने खाणे टाळा. नाहीतर आजारांना आमंत्रण मिळू शकते.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही चुका टाळणे गरजेचे आहे. कारण या चुकांमुळं वजन वाढण्यासारख्या समस्या वाढतात. जाणून घ्या जेवणानंतर काय खाणं टाळावं.
जेवणानंतर अनेकजण स्वीट डिश खाणं पसंत करतात. गोड पदार्थ खाण्याची सवय झाली असल्याने काहींचे जेवण त्याशिवाय पूर्णच होत नाही. मात्र, ही सवय धोकादायक ठरु शकते. गोड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढणे, कफ, खोकला, जडपणा जाणवू शकतो.
अनेक जणांना जेवणानंतर आइस्क्रीम खाण्याची सवय असते. मात्र जेवणानंतर लगेचच आइस्क्रीम खाणे आरोग्यासाठी हानिकारण ठरु शकते. गरम अन्नानंतर लगेचच थंड अन्न खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम म्हणतात. याला विरुद्ध अन्न असंही म्हणतात
जेवल्यानंतर लगेचच जिम किंवा व्यायाम करत असाल तर आत्ताच थांबा त्यामुळं उलट्या, पोटदुखी, अपचन होऊ शकते.
जेवून झाल्यानंतर शतपावली करावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. जेवणानंतर किमान 100 पावले चालावी, यामुळं अन्न पचण्यास आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते.