या गावाच्या बाबतीत, उत्सुकता अद्यापही टिकून आहे. कधी केरळला जायचा योग आला, तर या गावाला नक्की भेट द्या.
Twin Town in india : भारताची ओळख विविधतेतच आहे, पण एक गोष्ट मात्र याला अपवाद ठरत आहे. कारण, देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यात एक असं गाव आहे, जिथं डोकं भणभणून सोडतील इतकी जुळी मुलं आहेत. या गावातील अजब प्रकार पाहून शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत.
केरळच्या (Kerala Mallapuram) मलप्पुरम जिल्ह्यात असणाऱ्या कोडिन्हीची याच एका कारणामुळं जगभरात चर्चा सुरुये. इथे असणाऱ्या अनेक महिलांच्या पोटी जुळी मुलंच जन्माला येत आहेत. (A village from kerala which is known for twins birth rate)
तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण या गावात दर 1 हजार मुलांमागे 45 मुलं जुळी आहेत. सध्याच्या घडीला या गावातील जुळ्या मुलांची संख्या 400 हूनही जास्त आहे.
स्थानिकांची अशी धारणा आहे, की या गावावर देवाची कृपा आहे. म्हणूनच मागच्या 500 वर्षांमध्ये इथे 300 हून अधिक जुळ्या मुलांनी जन्म घेतला आहे. आता 300 x 2 = 600 अशीच आकडेमोड तुम्हीही करता का?
गावाच्या वेशीतून आत जातानाच जुळ्या मुलांच्या गावात स्वागत असे शब्द तुमचं Grand Welcome करत उत्सुकता शिगेला पोहोचवतात. या गावात जन्मणाऱ्या जुळ्या मुलांनी शास्त्रज्ञांनाही विचार करायला भाग पाडलं होतं. त्या धर्तीवर गावकऱ्याच्या DNA नमुन्यांच्या आधारे संशोधनही झाली. पण, हाती निराशाच आली. थोडक्यात या गावाच्या बाबतीत, उत्सुकता अद्यापही टिकून आहे. कधी केरळला जायचा योग आला, तर या गावाला नक्की भेट द्या.