70 कोटीमध्ये बनवलेल्या या चित्रपटाचे 3 वेळा बदलले होते नाव. बॉक्स ऑफिसवर केली होती जबरदस्त कमाई. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
2012 मध्ये आमिर खानचा 'तलाश' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, राणी मुखर्जी, राजकुमार राव आणि शीबा चड्ढा होते.
या चित्रपटात आमिर खानने पोलीस इंस्पेक्टरची भूमिका साकारली होती. तर रानी मुखर्जी यांनी आमिर खानच्या बायको भूमिका साकारली होती.
IMDb च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे नाव 3 वेळा बदलण्यात आले होते. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव 'धुआं' होते. त्यानंतर 'एक्ट ऑफ मर्डर' आणि 'जख्मी'. शेवटी या चित्रपटाचे नाव 'तलाश' ठेवले.
आमिर खान 'तलाश' चित्रपटाचा निर्माता देखील होता. हा चित्रपट सैफ अली खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांना देखील ऑफर करण्यात आला होता. पण त्यांनी नकार दिला.
त्यानंतर हा चित्रपट आमिर खानकडे गेला. रीमा कागतीने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 'तलाश'चा निर्माता आमिर खान होता.
रिपोर्टनुसार, आमिर खान आणि राणी मुखर्जी यांचा 'तलाश' चित्रपट 70 कोटींमध्ये बनवला होता. या चित्रपटाने जगभरात 180.83 कोटी रुपयांची कमाई केली होती.