Actor Who Quit Acting: काही कलाकारांच्या अभिनयाचे जादू फार काळ टिकली नाही. त्यांनी वेगळ्या कारणांसाठी अभिनय क्षेत्र सोडणाचा निर्णय घेतला होता परंतु नक्की यामागील कारणं काय आहेत? जाणून घेऊया.
अभिनेत्री कल्याणी ही लहाणपणापासून अभिनय क्षेत्रात होती. प्रभू देवासोबतही तिनं काम केले आहे. तिनं लोकप्रिय चित्रपटांमधून कामं केली आहेत. जयम, इनबा अशी तिच्या लोकप्रिय चित्रपटांची नावं आहेत. अभिनेत्रीला हॅरॅसमेंटलाही सामोरे जावे लागले होते. त्यामुळे तिनं ही इंडस्ट्री सोडली. तिचं आता लग्न झालं आहे.
सुपरस्टार सुर्या आणि कार्थी यांचे वडिल अभिनेते शिवकुमार यांनीही अभिनय सोडला आहे.
अब्बास हा अभिनेताही दक्षिणेत लोकप्रिय आहे. 2011 नंतर तो कुठल्याही चित्रपटातून दिसला नव्हता. त्यातून तो लॉकडाऊनमध्ये न्यूझीलंडला गेला आणि ते पेट्रोल पंप आणि मेकॅनिकचे काम पाहू लागला.
'गजनी' या चित्रपटातील अभिनेत्री असिन तुम्हाला आठवतं असेल. 2007 च्या त्या लोकप्रिय चित्रपटानंतर तिनं काम करणं सोडून दिले आणि आपल्या फॅमिली लाईफवर लक्ष केंद्रित केले आहे. 2016 साली तिनं बिझनेसमन राहूल शर्मासोबत लग्न केले. त्यांना आता एक मुलगीही आहे.
ऋचा गंगोपाध्याय हिनं दक्षिणेत लोकप्रय सिनेमे केले आहेत. परंतु तिनं नंतर मार्केटिंग केले. तिनं एमबीएचे शिक्षण घेतले.