PHOTOS

90 वर्षांपासून याच कुटुंबाच्या घरुन निघतो तुकोबांच्या पालखीचा अश्व; विठ्ठल दर्शनानंतर पोहोचणार देहूत...

षांची परंपरा! मानाचा 'राजा' अश्व तुकोबांच्या पालखीसाठी सज्ज, विठुरा...

Advertisement
1/9
आषाढी वारी
आषाढी वारी

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : आषाढी वारीनिमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होन्यासाठी पेठ बाभळगाव येथील मानाच्या अश्वाचे मोठ्या थाटामाटात वाजत गाजत प्रस्थान झालं आहे. 

2/9
परभणी
परभणी

परभणीच्या पाथरी तालुक्यातील पेठ बाभळगाव येथील विनायकराव रणेर घराण्यातील आश्वाला देहूच्या पालखीत मोठा मान आहे, गेल्या 90 वर्षांपासून तुकाराम महाराजांच्या पालखीत रणेर यांचा आश्व सहभागी होत असतो. 

3/9
परंपरा
परंपरा

या दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा या परंपरेला अनुसरून रणेर यांच्या घराण्यातील ‘राजा’ नावाचा अश्वाने पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे. लाडक्या विठुरायचे दर्शन घेऊन तो देहूकडे पालखीत सहभागी होण्यासाठी प्रस्थान करणार आहे. 

4/9
देवाचा अश्व
देवाचा अश्व

तुकोबारायांच्या पालखी बरोबर असणारा देवाचा अश्व रणेर घराण्याकडून देहूच्या वारीत सहभागी होत असतो आणि पालखीला पांडुरंगाच्या पायाशी नेऊन पोहोचवतो. 

5/9
तुकोबां
तुकोबां

माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांबरोबर एक देवाचा आणि एक स्वाराचा अश्व असतो. देवाच्या अश्वावर माऊलींच्या आणि तुकोबांच्या पादुका असतात. 

6/9
तीन पिढ्या
तीन पिढ्या

रणेर घराण्याने ही परंपरा मागील तीन पिढ्या म्हणजेच 90 वर्षांपासून जपली आहे. तुकोबांच्या पालखी बरोबर देवाच्या आश्वाचा मान रणेर घराण्याचा आहे. 

7/9
स्वाराचा अश्व
स्वाराचा अश्व

स्वाराच्या आश्वाचा मान अकलूजच्या स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा आहे. आता हा मान धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांभाळला आहे. पालखी प्रस्थानाच्या आदल्या दिवशी हे दोन्ही आश्व देहू मध्ये येतात. 

8/9
आधी पंढरपूर
आधी पंढरपूर

बाभुळगावहून येणारा अश्व आधी पंढरपूरला नेण्यात येतो. तिथे विठुरायाचे तो दर्शन घेतो, त्याची विधिवत पूजाही तेथे केली जाते आणि तिथून हा आश्व चालत देहूकडे आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी प्रस्थान ठेवतो. 

9/9
रिंगण
रिंगण

पालखी प्रस्थानाच्या आदल्या दिवशी हा अश्व देहूत पोहचतो आणि देवाचा आणि स्वाराचा आश्वांचा प्रवास पालखी सोहळ्यात सुरू होतो. या अश्वांचे काही ठिकाणी रिंगणही पार पडतात. पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचल्यावर काल्याच्या कीर्तनानंतर दोन्ही आश्व माघारी फिरतात असं बाभूळगाव येथील रणेर कुटुंबीय सांगतायेत.

 





Read More