भारतातील या रोमँटिक ठिकाणी पावसाळ्यात प्रत्येक कपल्सने भेट दिलीच पाहिजे.
भारतात पावसाळा ऋतू हा अत्यंत आनंददायक मानला जातो. या ऋतूमध्ये फक्त उन्हापासूनच आराम मिळत नाही, तर हवेत एक वेगळीच रोमँटिकपणा जाणवतो. म्हणून या ऋतूला प्रेमाचा ऋतू असे म्हटलं जात.
जर तुम्हाला देखील बायको किंवा गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचं असेल तर तुम्ही भारतातील या प्रसिद्ध ठिकाणी फिरू शकता. जाणून घ्या सविस्तर
केरळमधील मुन्नार हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथे चहाचे हिरवेगार मळे, धुक्याने भरलेल्या डोंगररांगा आणि धबधबे हे तुम्हाला प्रचंड आकर्षित करतात. येथे स्वर्गासारखं वातावरण आहे.
ऊटी हे कपल्ससाठी एक अतिशय चांगलं ठिकाण आहे. शांत सरोवरे, बॉटनिकल गार्डन्स आणि नीलगिरी पर्वतरांगांच्या सान्निध्यात ऊटी खूपच सुंदर दिसते.
त्यासोबत पावसाळ्यात गोवा हे कपल्ससाठी एक खास ठिकाण आहे. कारण पावसाळ्यात गर्दी कमी असते. त्यामुळे तुम्ही समुद्रकिनारी शांत वेळ घालवू शकता.
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हे हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाळ्यात येथे फिरणं म्हणजे एक जिवंत चित्रपटाचा अनुभव येतो.
मेघालयातील शिलाँग हे पावसाळ्यातील एक सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथे अनेक धबधबे, हिरव्या टेकड्या आणि शांत वातावरण हे तुम्हाला आकर्षित करते.
जोडीदारासोबत तुम्ही वरील दिलेल्या ठिकाणी मनसोक्त, शांततेत आणि प्रेमळ वातावरणात वेळ घालवू शकता.