Entertainment : या अभिनेत्रीने वयाच्या 15 वर्षी वडिलांच्या मर्जीने लग्न केलं. त्यानंतर 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यशाचं शिखर चढत असताना अभिनेत्री 18 व्या वर्षी आई झाली.
बॉलिवूडमध्ये आल्यावर या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले. त्या काळातील सुपरस्टार राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रा विचारलं हे मुलं कोणाचं? त्यानंतर अभिनेत्रीने राजेश खन्नाशी बोलणं बंद केलं.
निरागस चेहऱ्याची ही अभिनेत्री होती मौसमी चटर्जी. खूप हुशार अशी ही अभिनेत्री रेखापासून राजेश खन्ना यांच्यापर्यंत वाद झाला होता.
जयंत मुखर्जीसोबत लग्न झाल्यानंतक18 वर्षांची असताना त्यांनी पहिल्या मुलीचा जन्म झाला. त्यावेळी राजेश खन्ना यांच्या प्रश्नामुळे अभिनेत्री संतापली होती.
खुद्द मौसमी चॅटर्जीने याचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. मौसमी यांनी सांगितलं की, जेव्हा ती 5 महिन्यांची गरोदर होती, तेव्हा राजेश खन्ना यांनी विचारलं, 'ती विनोद मेहरा यांच्या मुलाची आई होणार आहे का?' हे ऐकून मौसमी यांना राग अनावर झाला.
राजेश खन्ना यांना त्यांच्याच भाषेत मौसमी यांनी उत्तर दिलं होतं. त्यांनी राजेश खन्ना यांना विचारलं, 'तुमच्या मुली ऋषी कपूरच्या आहेत की तुमच्या?' . मौसमी यांच्या उत्तर ऐकून राजेश खन्ना यांना धक्काच बसला.
मौसमी चटर्जीनेही तिच्या मुलाखतीत सांगितले होतं की, ती राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये भेटायला गेली होती. यावेळी त्यांनी आपल्या मुलीचं कौतुक केलं होतं.
मौसमी चटर्जी यांची मोठी मुलगी पायलचं 2019 मध्ये निधन झालं. मुलीच्या मृत्यूमुळे मौसमी बराच काळ शॉकमध्ये होत्या. अभिनेत्रीने तिच्या मुलीच्या मृत्यूसाठी जावयाला जबाबदार धरलं होतं.