PHOTOS

जैन मुनी वस्रं का परिधान करत नाहीत? सार्वजनिक ठिकाणी विवस्र राहण्यामागील खरं कारण काय?

es: जैन साधू विवस्र का असतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला ...

Advertisement
1/10

मोठे सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा सभा सगळीकडे जैन मुनी विवस्रच असल्याचं पाहायला मिळतं. मात्र जैन साधू वस्रं का परिधान करत नाहीत? यामागील खरी कारणं काय आहेत? जाणून घेऊयात सविस्तरपणे....

2/10

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात अनेक धर्म आणि अध्यात्मिक विचारसरणी असणारे समाज वास्तव्यास आहेत. वेगवेगळ्या प्रथा भारतात आचरणात आणणारे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. भारतातील प्रमुख धर्मांपैकी एक असलेला जैन धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे. जैन धर्म केवळ भारतापुरता मर्यादित नसून अमेरिका, ब्रिटन, आफ्रिका आणि जपानमध्येही विस्तारलेला आहे. या धर्मामध्ये अहिंसा आणि संसार पूर्णपणे त्यागने यासारख्या गोष्टींना विशेष महत्त्व आहे.

 

3/10

जैन धर्मातील साधू कठोर साधना आणि तपश्चर्या करतात. जैन धर्मातील लोक कठोर तपश्चर्या करणाऱ्या साधुंना देवाप्रमाणेच पुजतात. जैन साधू दोन प्रकारचे असतात. एक पांढरी वस्रं परिधान करणारे आणि दुसरे श्वेतांबर साधू. श्वेतांबर साधू वस्र परिधान करत नाहीत.

 

4/10

श्वेतांबर साधू हे दिगंबर साधू असतात. दिगंबर साधुंच्या कठोर तपश्चर्येमध्ये कितीही थंडी असली तरी कपड्यांशिवाय राहावं लागतं. हे साधू अंथरुण, पांघरुणाचा आधार घेत नाहीत. प्रत्येक वातावरणामध्ये ते विवस्रच राहतात. 

 

5/10

जैन धर्मातील साधून हे उच्च शिक्षित असतात. त्यांची आर्थिक स्थिती उत्तम असते आणि खास बाब म्हणजे ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्‍या फारच स्वस्थ असतात. हे सारं काही गुप्त हेतू किंवा पैसे कमावण्याच्या हेतूने मुद्दाम केलेलं नसतं तर जैन साधू पूर्णपणे वैराग्याचा अभ्यास करत सर्व सांसारिक सुखांना तिलांजलि देत त्यांचा त्याग करतात. एखाद्या गोष्टीची आसक्ती ठेवल्यास त्यामधून दु:ख प्राप्त होतं, अशी जैन धर्माची मान्यता आहे.

 

6/10

जैन दिगंबर साधू आपल्या इच्छेने सर्व गोष्टी त्यागतात. त्यामध्ये कपड्यांचाही समावेश असतो. त्यांच्यासाठी कपडे परिधान करणे हे भौतिक जगात आपण अडकून पडलो आहोत असं समजण्यासारखं आहे. कपडे परिधान करणे, ते साफ, स्वच्छ ठेवणे यासाठी पुन्हा पैसे खर्च करणं आलं.

7/10

त्यामुळे कपड्यांच्या माध्यमातून ते पुन्हा मोह-मायेच्या जाळ्यात अडकून पडण्याची शक्यता असते. म्हणूनच या भौतिकतावादात अडकून पडू नये म्हणून कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापासून जैन साधू दूर राहतात. जैन मान्यतेनुसार कोणीही कोणतीही वस्तू घेऊन जगात येत नाही. त्यामुळेच कोणतीही गोष्टी मानव निर्मित नाही. 

 

8/10

जैन साधुंना सर्व सांसारिक गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यामुळेच त्यांना दिगंबर म्हटलं जातं. त्यांनी दिशांनाच आपलं वस्र बनवलं असून त्याच ते धारण करतात, असं मानलं जातं. दिगंबर साधुंचं जीवन फार कठीण असतं. त्यांना आजीवन ब्रम्हचार्याचं व्रत पाळावं लागतं. 

 

9/10

जैन साधुंना सांसारिक सुखाबरोबरच कपड्यांचाही त्याग करावा लागतो. अशी मान्यता आहे की लहानपणे ज्याप्रमाणे मुलं नग्नावस्थेत असूनही मनाने निर्मळ असतात त्याप्रमाणे हे साधून कपडे त्यागल्यानंतरही सर्व भावनांपासून मुक्त होतात. 

 

10/10

जैन धर्माच्या मान्यतनेनुसार कपडे त्यागल्यानंतर मनात इतरांबद्दल असणारे आकर्षणही संपुष्टात येतात. असे साधू एखाद्या मुलाप्रमाणे असतात. लहान मुलांना ज्या प्रकारे कपड्यांशिवाय पाहिल्याने काही फरक पडत नाही तशाच पद्धतीने या साधुंना विवस्र पाहिलं तरी काही फडत नाही असं त्यांचं आचरण हवं. जेव्हा मनात काही खोट असते तेव्हाच अंगावर लंगोट असते, असं जैन मुनींचं म्हणणं असतं. दिगंबर साधुंच्या मनात कोणती खोट नसते त्यामुळे त्यांच्या अंगावर लंगोटही नसतं. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सोशल मीडियावरुन साभार) (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

 





Read More