: टीम इंडियाचे अॅग्रेसिव्ह खेळाडू म्हणून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना ओळखलं जातं. या दोन्ही खेळाडू...
मागील आयपीएल हंगामात गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात भर मैदानात राडा झाला होता. तर यंदाच्या आयपीएल हंगामात मात्र चित्र वेगळंच दिसलं.
यंदाच्या हंगामात विराट आणि गंभीर जेव्हा आमने सामने आले तेव्हा दोघांनी हात मिळवला आणि गळाभेट घेतली.
दोन्ही दिग्गज खेळाडूंचा वाद मिटला की काय? असा प्रश्न विचारला जातोय. अशातच आता गंभीरने दोघांच्या नात्यावर मोठं विधान केलंय.
विराट कोहलीसोबत माझं नातं असं काही आहे, जे या देशाला माहित असणं आवश्यक नाही, असं म्हणत गंभीरने सणसणीत उत्तर दिलंय.
विराटला व्यक्त होण्याचा आणि आपल्या संबंधित संघांना विजय मिळवून देण्यासाठी मला जितका अधिकार आहे तितकाच त्याला देखील अधिकार आहे, असंही गंभीर म्हणतो.
आमचा संबंध लोकांना मसाला देण्यासाठी नाही, असंही गौतम गंभीर विराट कोहलीवर बोलताना म्हणाला आहे.
दरम्यान, गौतम गंभीर टी-20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक असेल अशी जोरदार चर्चा रंगलीये. त्यामुळे आता एकाच म्यानात दोन तलवारी कशा राहणार? असा सवाल विचारला जातोय.