t Should Not Carry in Train: भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथे सर्वात मोठे नेटवर्क आहे. दररोज लाखो लोक रेल्वेतून प्रवास क...
कित्येक तासांचा रेल्वे प्रवास असेल तर प्रवाशांकडून जेवणाचा डब्बा आणि काही खायचे पदार्थ नेले जातात. पण रेल्वे प्रवासात मोजकंच सामान नेण्याचा सल्ला दिला जातो. त्यात एका फळाचाही समावेश आहे.
रेल्वेतून प्रवास करताना ज्वलनशील पदार्थ, सिलेंडर आणि स्फोटक पदार्थ घेऊन जाण्यास मनाई असते. मात्र या यादीत एका फळाचादेखील समावेश आहे.
रेल्वेच्या नियमावलीनुसार, तुम्ही हे फळ प्रवासात नेऊ शकत नाही. त्यामुळं तुम्हाला दंडदेखील ठोठावला जाऊ शकतो
तुम्हाला सुद्धा रेल्वेचा हा नियम वाचून आश्चर्य वाटलं ना. पण रेल्वेच्या नियमानुसार, या फळाला ज्वलनशील पदार्थ असं म्हटलं आहे.
या फळाचे नाव आहे नारळ. सुकलेले नारळ तुम्ही ट्रेनमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल.
नारळाला बुरशी लागण्याची शक्यता तर असतेच. पण नारळाची सालं लवकर पेट घेण्याची शक्यता असते त्यामुळं ट्रेनमध्ये तुम्ही नारळ नेऊ शकत नाही
सुकलेल्या नारळाचा भाग ज्वलनशील असतो त्यामुळं आग लागण्याची शक्यता वाढते.