PHOTOS

Burn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन

Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.

Advertisement
1/5

खूप गोड खाल्ल्यानंतर दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. याशिवाय तुम्ही संत्रा आणि बीटचा रस देखील पिऊ शकता.

2/5

भरपूर गोड खाल्ल्यानंतर तुम्ही तुमच्या आहारात जास्तीत जास्त सॅलड्स, स्प्राउट्स, हिरव्या भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. असे केल्याने तुमची भूक नियंत्रणात राहील.

3/5

शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यासाठी तुम्ही काळी मिरी चहा देखील पिऊ शकता. हे खरं तर डिटॉक्स ड्रिंकसारखे काम करेल जे तुमच्या शरीरातील चरबी जाळून टाकेल.

4/5

याशिवाय चरबी कमी करण्यासाठी कोमट लिंबूपाणी प्या. ही रेसिपी देखील खूप प्रभावी आहे. मिठाई खाल्ल्यानंतर हे करणे आवश्यक आहे.

5/5

सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरपूर गोड खाल्ल्यानंतर, चरबी जाळण्यासाठी एक ग्लास गरम पाणी प्या. असे केल्याने शरीरात साठलेल्या कॅलरीज बर्न होतील आणि सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतील.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)





Read More