PHOTOS

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातले प्रसिद्ध कॅफे आजही सुरू; 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Old Cafe in India: आजवर भारतात आलेल्या आणि कैक वर्षे भारतावर अधिपत्य राखून ठेवलेल्या ब्रिटीशांनीही भारतीय खाद्यसंस्कृतीवर प्रत्यक्ष आणि...

Advertisement
1/7
अस्तित्वं
अस्तित्वं

ब्रिटीशकाळापासूनच भारत या न त्या कारणानं देशाच्या नकाशावर अधिक ठळकपणे आपलं अस्तित्वं निर्माण करताना दिसला. अशा या समृद्ध इतिहास असणाऱ्या या भारताच्या भूतकाळात डोकावूया. 

2/7
कॅफे
कॅफे

भारताच्या खाद्यसंस्कृतींमध्ये जितकं महत्त्वं ढाब्यांना आहे तितकंच उपहारगृह आणि कॅफेंनाही आहे. मूळात कॅफे ही संस्कृती पाश्चिमात्य असली तरीही भारतात ती रुळली आणि बहरलीसुद्धा, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. आजही देशात स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेले काही कॅफे खवैय्यांची नजर रोखताना दिसतात. तुम्हीही या कॅफेंना भेट देऊ शकता. 

 

3/7
कॅफे लिओपोल्ड
कॅफे लिओपोल्ड

मुंबईत साधारण 1871 मध्ये कॅफे लिओपोल्डची सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत या कॅफेमध्ये परदेशी नागरिकांसमवेत हल्लीहल्ली मोठ्या प्रमाणावर तरुणाई गर्दी करताना दिसते. हा तोच कॅफे आहे, जिथं 2008 मध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. 

4/7
करिम्स
करिम्स

1913 पासून सुरु झालेल्या दिल्लीतील करिम्स या ठिकाणी मांसाहार इतक्या सुरेखपणे तयार आणि सादर केला जात होता की पदार्थ पाहूनच नजरेनं खवैय्यानं पोट भरत असे. नल्ली निहारी, मटन कोरमा, सीथ कबाब या आणि अशा अनेक मुघलई पदार्थांसाठी करिम्सला तेव्हापासून आतापर्यंत अनेकांचीच पसंती. 

 

5/7
इंडियन कॉफी हाऊस
इंडियन कॉफी हाऊस

भारतातील अनेक बुद्धिजीवींनी एक कप कॉफी, ऑम्लेट आणि तत्सम पदार्थांची चव चाखत कोलकात्यातील इंडियन कॉफी हाऊस इथं अनेक कल्पनांना चालना दिली. इतिहासाची साक्ष देणारा हा कॅफे 100 वर्षांहूनही जुना असून इथं खुद्द रवींद्रनाथ टागोर, सत्यजीत रे, सुभाषचंद्र बोस या आणि अशा अनेक महान व्यक्तींनी हजेरी लावल्याचं सांगितलं जातं. 

 

6/7
ग्लेनेरिज
ग्लेनेरिज

दार्जिलिंगमधील हे एक कमाल बेकरी रेस्तराँ म्हणे कलेचा एक उत्तम नमुना. बेक केलेल्या प्रत्येक गोष्टीचा कमाल सुगंध आजही या ठिकाणाहून दार्जिलिंगच्या मॉल रोडवर दरवळतो. साधारण 100 वर्षांहून अधिक मोठा काळ पाहिलेल्या या ठिकाणी टार्ट, मफिन, केक, पाई, रोल असे अनेक बेकरी प्रोडक्ट मिळतात. 

 

7/7
ब्रिटानिया अँड कंपनी
ब्रिटानिया अँड कंपनी

1923 मध्ये ईराणहून भारतात आलेल्या कोहिनूर कुटुंबानं ब्रिटानिया अँड कंपनीची स्थापना केली. पारसी पद्धतीचे खाद्यपदार्थ आणि येथील कमाल माहोल कायच ब्रिटानियाला खवैय्यांच्या यादीत मानाचं स्थान देऊन जातो. 

 





Read More