India vs Canada Issue Akshay Kumar: भारत आणि कॅनडादरम्यानचा वाद शिगेला पोहचला आहे. मंगळवारी भारताने 5 दिवसांच्या आज कॅनडाच्या राजदूतांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. असं असतानाच कॅनडानेही आपली हेकेखोरी कायम ठेवत काही निर्णय घेतल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. मात्र या सर्व वादामध्ये अभिनेता अक्षय कुमारला ट्रोल केलं जात आहे. नेमकं घडलंय काय आणि लोकांचं म्हणणं काय हे पाहूयात...
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडियन संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला असून भारताचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला आहे. मात्र या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं असून कॅनडियन राजदूतांना 5 दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रूड्रो यांनी सोमवारी संसदेमध्ये भाष्य करताना हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा केला. यानंतर त्यांनी भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तातडीने भारतात परत पाठवलं. यावरुनच आता दोन्ही देशांमध्ये टोकाचा संघर्ष सुरु झाला आहे. कॅनडाने अगदी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊ नका तिथे दहशतवादाला धोका आहे अशा सूचनाही या वादानंतर आपल्या नागरिकांसाठी जारी केल्या आहेत. एकीकडे या वादाचे गंभीर पडसाद पडत असताना दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमार यावरुन ट्रोल होताना दिसत आहे.
आता या प्रकरणाचा अक्षय कुमारशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 15 ऑगस्ट रोजी अक्षय कुमारने आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळालं असल्याचं जाहीर केलं होतं. यापूर्वी अक्षय कुमार हा कॅनडाचा नागरिक होता. भारतामध्ये दुहेरी नागरिकत्वाला कायदेशीर मान्यता नसल्याने मागील अनेक दशकांपासून भारतात राहूनही अक्षयकडे कॅनडीयन नागरिकत्व होतं. याचाच संदर्भ आता त्याला भारत-कॅनडा वादावरुन ट्रोल करताना घेतला जात आहे. पाहूयात याचसंदर्भातील व्हायरल मिम्स...
अक्षय कुमारच्या मनात याच भावना असतील असं या मीममध्ये म्हटलंय.
आपण योग्यवेळी कॅनडा सोडल्याचं आनंद अक्षयला होत असेल असं या मिममध्ये म्हटलं आहे.
योग्यवेळी कॅनडा सोडल्यानंतर अक्षय कुमार
चित्रपटाला शोभेल अशी एक्झीट
अक्षय म्हणत असेल वाचलो...
योग्यवेळी काढता पाय घेतला पाहिजे हा संवाद कोणीतरी अक्षय कुमारला योग्य ठरतोय असं म्हटलंय.
कॅनडाच्या झेंड्यासहीत पोस्ट करत केलं ट्रोल
भारतीय म्हणत असतील, थोडक्यात वाचलास अक्षय.
योग्यवेळी भारतीय नागरिकत्व मिळालं अक्षय कुमारला
सध्याच्या प्रकरणातून काढता पाय घेताना खिलाडी अक्षय कुमार
म्हणे अक्षय कुमार साकारणारा भारतात परत पाठवण्यात आलेल्या अधिकाऱ्याची भूमिका.
यांनी तर बनवली परफेक्ट स्क्रीप्ट
आताची परिस्थिती पाहताना बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार
एकेकाळी मी सुद्धा कॅनडाचा नागरिक होतो
सध्याच्या परिस्थितीकडे पाहताना अक्षय कुमार