PHOTOS

एक शब्दच पुरेसा; विराटच्या Insta Bio मध्ये लिहिलेल्या त्या शब्दाचा नेमका अर्थ वाचून म्हणाल 'मानलं ह्याला....'

025) आयपीएलच्या यंदाच्या हंगमातील विजेता संघ आणि या संघातील अष्टपैलू खेळाडू विराट कोहली याच्याबाबतची ही...

Advertisement
1/8
18 वा हंगाम
18 वा हंगाम

Virat Kohli Instagram : (IPL 2025) यंदाच्या वर्षी आयपीएलचा 18 वा हंगाम विराट कोहलीसाठी अतिशय खास ठरला. 18 क्रमांकारी जर्सी घालून मैदानात येणाऱ्या विराटनं गेली 18 वर्षे या संघाची साथ दिली आणि अखेर जेतेपद मिळवलं. 

2/8
अद्वितीय
अद्वितीय

अद्वितीय आणि कमाल आनंदाच्या या क्षणी विजयी पताका उंचावणाऱ्या विराटच्या भावनांचा बांध फुटला. इतक्या वर्षांची प्रतीक्षा फळल्यानं त्याला मैदानावरच रडू कोसळलं आणि प्रत्येक क्रिकेटप्रेमीचं मन विराटला पाहून दाटून आलं. 

3/8
मोठं नाव
मोठं नाव

जिद्द, चिकाटीच्या बळावर क्रिकेट विश्वात मोठं नाव कमवणाऱ्या विराट कोहलीनं त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक मोठी यशशिखरं गाठली. मात्र आयपीएलचं जेतेपद त्याला सतत हुलकावणी देत होतं. पण, अखेर तो क्षण आलाच... 

4/8
आरसीबी
आरसीबी

इथं आरसीबी (RCB)च्या वाट्याला विजेतेपद मिळालं आणि तिथे विराटचच नाव सोशल मीडियावर ट्रेंड करु लागलं. इन्स्टाग्राम म्हणू नका किंवा मग फेसबुक जिथंतिथं पक्त विराटच! 

 

5/8
इन्साटाग्राम पोस्ट
 इन्साटाग्राम पोस्ट

या उत्साही वातावरणात विराटनंही त्याच्या इन्साटाग्राम पोस्टच्या माध्यमातून संघासाठी एक खास पोस्ट लिहिली. त्याच्या पोस्टला क्षणातच लाखो लाईक्स मिळाले आणि लक्ष वेधलं ते म्हणजे या खेळाडूच्या Insta Bio नं. 

 

6/8
एकच शब्द
एकच शब्द

जिथं अनेकजण इन्स्टा बायोमध्ये स्वत:विषयी बरीच माहिती देतात, तिथंच विराटनं मात्र त्याच्या बायोमध्ये एकच शब्द लिहीला आहे. मुळात हा एकच शब्द अनेक गोष्टी सूचवू पाहत आहे असं म्हणायला हरकत नाही. विराटनं लिहिलेला हा शब्द आहे, Carpediem!. 

 

7/8
लॅटिन वाक्यांश
लॅटिन वाक्यांश

Carpediem हा एक लॅटिन वाक्यांश असून, आहे त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घ्या आणि तो पुरेपूर जगा असा या शब्दाचा अर्थ आहे. विराटकडे पाहता खऱ्या अर्थानं तो त्याचा प्रत्येक क्षण जगतोय असंच वाटतंय आणि त्याचमुळं हा एकच शब्द पुरेसा आहे असं म्हणायला हरकत नाही. 

 

8/8
मनमुराद आनंद
मनमुराद आनंद

असं म्हणतात की कार्पेडियम शब्द सर्वप्रथम रोमन कवि होरेस यांच्या कवितेत वापरण्यात आला होता. ईसवी सनपूर्व 23 व्या शतकात ही कविता लिहिण्यात आली होती. कवितेच्या माध्यमातून रोमन कविनं लोकांना मृत्यूची चिंता करण्याऐवजी आयुष्याचा पुरेपूर आणि मनमुराद आनंद लुटा आणि वेळेचा सर्वाधिक उपयोग करा असा संदेश देत प्रोत्साहित केलं होतं. 





Read More