येण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार जेवणात हिरव्या मिरचीचा वापर करतो. मात्र हिरवी मिरची चिरताना अनेकांच्या हातांना खूपच जळजळ होते....
मिरची चिरताना हातांना जळजळ होण्याच्या समस्येपासून वाचण्यासाठी मिरची चिरण्याआधी तुम्ही हातांना एलोवेरा जेल लावू शकता. एलोवेरा जेल लावल्याने तुम्हाला जळजळीपासून आराम मिळण्यास मदत होईल.
याव्यतिरिक्त, दहीसुद्धा या समस्येवर उत्तम उपाय ठरु शकतो. मिरची चिरल्यानंतर हातांना जळजळ होत असल्यास तुम्ही हातांवर दह्याच्या साहाय्याने मसाज करु शकता.
तसेच, हातांना जळजळ होत असल्यास तुम्ही मधदेखील वापरु शकता. हातांवर मधाचा मसाज या समस्येवर आरामदायी उपाय ठरु शकतो.
जर मिरची चिरल्यानंतर हातांना तीव्र जळजळ होत असल्यास अशावेळी तुम्ही आइस क्यूबचा वापर करु शकता. हातांवर आइस क्यूब लावल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते.
याव्यतिरिक्त, हातमोजे जळजळीपासून वाजण्यासाठी एक चांगला उपाय ठरतो. अशा परिस्थितीत तुम्ही हातमोजे घालून मिरची चिरु शकता.
हिरवी मिरची चिरताना होणारी जळजळ कमी करण्यासाठी अशा वेळी तुम्ही हातांना लिंबाचा रसदेखील लावू शकता. लिंबाच्या रस जळजळीपासून आराम मिळण्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)