खताय. पण पीठ आंबतच नाहीये किंवा फुगतच नाहीये, असं तुमच्यासोबत ...
पावसाळ्यात इडलीचे पीठ नीट आंबण्यासाठी काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत. त्याचा वापर केल्यास पीठ छान फुगून येईल. इतकंच नव्हे तर इडल्याही छान मऊसूत होऊन फुगतात.
पावसाळ्यात वातावरणात गारवा असतो आणि दमटपणा जास्त असल्यामुळं पिठातील जिवाणूंची वाढ मंदावते. त्यामुळंच पीठ आंबायला वेळ लागतो किंवा पीठ फुगत नाही.
थंड हवामानामुळं पिठाला आवश्यक असलेली उष्णता मिळत नाही. त्यामुळं किण्वन प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. या कारणांमुळं पावसाळ्यात पीठ ठेवण्यासाठी योग्य जागा निवडण्याची गरज आहे.
पावसाळ्यात इडलीचे पीठ छान फुलण्यासाठी एक खास टिप्स वापरावी. यामुळं अगदी वरपर्यंत पीठ फुलते आणि इडलीदेखील चवीला छान होते.
डाळ आणि तांदुळ रात्रभर भिजवून ठेवल्यानंतर वेगवेगळे वाटून घ्या. दोन्हीही जाडे-भरडे न वाटता एकदम पातळ वाटून घ्या.
पीठ एका मोठ्या भांड्यात काढून त्यात चवीपुरते मीठ टाका. मीठाचे प्रमाण योग्य ठेवा. जास्त मीठ घातल्यास किण्वन प्रक्रिया मंदावते आणि कमी मीठ घातल्यास पीठ नीट आंबत नाही.
तसंच, तुम्ही पिठात 2 टीस्पून तिळाचं तेल टाका. तिळाच्या तेलाने इडलीची चव छान लागते. तसंच, इडलीच्या पिठात इनो टाकून थोडासा लिंबू पिळा आणि पीठ छान एकजीव करा.
इडलीचे पीठ आंबवण्यासाठी तुम्ही रात्रभर ते भांडे ओव्हनमध्ये ठेवू शकता. पीठ आंबवण्यासाठी शक्यतो काचेचे किंवा स्टेनलेस स्टीलचे भांडे वापरा. प्लास्टिकचे भांडे वापरणे टाळा, कारण ते उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करत नाही. तसंच, पिठाला 6-8 तास झाकून ठेवा. तुम्ही पिठावर शाल किंवा गरम कापड गुंडाळू शकता, ज्यामुळे ते उबदार राहील