Sharad Pawar Resigns From NCP President: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रातील राजकारणात पु्न्हा एकदा खळबळ माजली. या पुस्तकातून त्यांनी पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचे सरकार जाण्यापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार यांनी मोठा खुलासा केला. अजित पवार यांनी केलेल्या बंडाला राष्ट्रवादीचा कधीही पाठिंबा नव्हता. अजित पवारांचा हा प्रयोग अयशस्वी ठरला.
अजित पवारांचं बंड अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याजवळ दिलगिरी व्यक्त केली. "जे घडलं ते चुकीचं झालं, असं घडायला नको होतं."
शरद पवार यांना शपथविधीची घटना पहाटे 6.30 वाजतात कळाली होती. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन या बंडाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं.
अशी माहिती समोर आली होती की, शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांशी वैयक्तिक फोन करुन संवाद साधला होता. त्यांनी आमदारांना एकजुट ठेवलं.
जानेवारीमध्ये नितीन गडकरी आणि शरद पवार कोल्हापूर दौऱ्यात भेटले होते. त्यावेळी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तिथे त्यांनी निवडणुकीची बांधणी करण्याचा प्रयत्न केला होता, असं सूत्रांची माहिती आहे.
अशी माहिती समोर आली होती की, शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांशी वैयक्तिक फोन करुन संवाद साधला होता. त्यांनी आमदारांना एकजुट ठेवलं.
जानेवारीमध्ये नितीन गडकरी आणि शरद पवार कोल्हापूर दौऱ्यात भेटले होते. त्यावेळी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तिथे त्यांनी निवडणुकीची बांधणी करण्याचा प्रयत्न केला होता, असं सूत्रांची माहिती आहे.
ज्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा झटका दिला होता. पक्षाने राष्ट्रीय दर्जा गमावल्या त्यांनतर राजकारणातील चाणक्य शरद पवार यांनी नवीन खेळी खेळली. कर्नाटकात सुमारे 40 ते 45 जागा लढवण्याची तयारी पक्षाने केल्याची माहिती समोर आली.
लोकसभेची निवडणूक लक्षात घेत शरद पवार यांनी राहुल गांधींची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी देशातील सर्व विरोधकांना एकत्र येऊन भाजपविरोधात सामना करण्याची रणनिती आखली.
नेते शरद पवार यांचीही जेव्हा ईडी चौकशी होणार ही बातमी आली होती. त्यावेळी ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशीला सामोरे जाऊ आणि त्यांचा पाहुणचार घेऊ, असं म्हणत मास्टर स्ट्रोक मारला होता. त्यांचा या विधाननंतर राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, मनसे आणि विरोधी पक्षांना संजीवनी मिळाली होती.