्रीबद्दल बोलत आहोत, तिने प्रत्येकांच्या हृदयात खास निर्माण केलीय. सुपरस्टार, ब्लॉकबस्टर मुव्ही आणि शिखरावर करिअर असताना तिने लग्न केलं....
ती निर्मात्यांची पहिली पसंत होती. तिच्यासोबत काम करण्याचं अनेक अभिनेत्यांचे स्वप्न होतं. तिने अनेक मोठ्या स्टारसोबत काम केलं. तिचं नाव संजय दत्त आणि अनिल कपूरशी जोडण्यात आलं. अगदी क्रिकेटच्याही प्रेमात पडली होती.
बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून तिची ओळख. कळलं ना आम्ही कोणासोबत बोलत आहोत. आज अभिनेत्रीचा 57 व्या वाढदिवस आहे.
माधुरीचं करिअर उंच शिखरावर असताना ती एका क्रिकेटपटूच्या प्रेमात पडली होती. त्यांचे फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, यांचं प्रेम लग्नापर्यंत पोहोचलं होतं. पण ही लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचली नाही.
या क्रिकेटपटूच्या प्रेमासाठी माधुरी काही पण करायला तयार होती. ती खेळाडूनही त्याच्या करिअरमध्ये चांगल्या स्थानावर होता.
माधुरी दीक्षित ही अजय जयेजाच्या प्रेमात वेडी होती. या दोघांची ओळख एका जाहीरमध्ये झाली. त्यानंतर त्यांचं प्रेम फुलत गेलं.
या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही याचं कारण ठरलं कुटुंब. खरं तर नेमकं कारण काय होतं हे कधीच समोर आलं नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार जडेजाच्या कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता. तर दुसरीकडे मॅच फिक्सिंगच्या आरोपात अजयचं नाव आलं आणि माधुरीच्या घरच्यांनीही या नात्याला विरोध केला.
ही मराठीमोळी मुलगी बॉलिवूडमधील सुपरस्टार होती. तिने तेजाब, बेटा, दिल, खलनायक अनेक चित्रपटातून तिच्या अभिनय आणि डान्सची जादू प्रेक्षकांना घायाळ केलं.
त्या काळात माधुरीचं नाव विवाहित अभिनेत्यांशीही जोडलं गेलं होतं. तिला घर तोडणारी अभिनेत्री अशा टॅगही मिळाला होता. संजय दत्त यांच्या प्रेमाच्या चर्चा आजही मीडियामध्ये होतात. संजूबाबूचं नाव बॉम्बस्फोट प्रकरणात आलं आणि माधुरी त्याच्या आयुष्यातून निघून गेली.
अनेक मीडिया रिपोर्टनुसार अनिल कपूर आणि माधुरी यांच्यामध्येही अफेअर होतं अशा बातम्या आल्या होता. पण यावर दोघेही कधीच स्पष्ट बोले नाहीत.
तर दयावान या चित्रपटातील विनोद खन्नासोबत लिपलॉक सीनमुळे माधुरी दीक्षित रात्रभर रडत होती असं म्हणतात.
90 च्या दशकात सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी ती एक होती. माधुरी दीक्षित 1999 मध्ये टॉप स्टार असताना तिने लग्न केलं. प्रसिद्ध हृदय व वक्ष शल्यचिकित्सक डॉ. श्रीराम नेनेसोबत लग्न करून तिने बॉलिवूडला रामराम केला.
अमेरिका सोडून ती पुन्हा भारतात परतली असून तब्बल 9 वर्षांनी तिने अभिनयाच्या दुनियत पदार्पण केलंय.