ातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळं मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ...
पुणे, कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहेत. काही जिल्ह्यातील नद्यांनी धोका पातळी गाठली आहे. त्यामुळं पुराचं पाणी शहरात व गावागावात शिरलं आहे.
कालपासून कोसळत असलेल्या पावसामुळे कल्याण ग्रामीण भागातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कल्याण नगर महामार्गावरील रायते पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
भिमाशंकर मार्गावर दरड कोसळली असुन राजगुरुनगर मार्गे भिमाशंकरला जाणारी वाहतुक बंद करण्यात आली अनेक गावांना दरड कोसळण्याचा धोका
कल्याणच्या रेती बंदर परिसरात खाडीचे पाणी शिरले आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. खाडीलगत असलेल्या घरातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.
पुण्याच्या राजगुरुनगर येथील पोलीस कस्टडीत गुडघाभर पाणी साचले आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसाने येथील चारही कस्टडी रुममध्ये गुडघाभर पाणी शिरले आहे.
पुण्यातील आंबेगाव येथील जांभळेवाडीवरील बाजूस असणाऱ्या डोंगराचा काही भाग कोसळला आहे. रस्त्यावर दरड कोसळल्याने तीन वाड्यांचा संपर्क तुटला.
बदलापूर कर्जत महामार्ग पाण्याखाली रेल्वे रूळ पाण्याखाली येण्याची शक्यता. संततधार पावसानं बदलापूर कर्जत महामार्ग चामटोली जवळ पाण्याखाली आला आहे
सिंहगड रोडवरील एकता नगर परिसरात पुराचे पाणी साचले आहेत. त्यावेळी अडकलेल्या नागरिकांना बोटींच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले.
कोल्हापुरातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
रायगडमधील ताम्हिणी घाटात दरड कोसळली आहे.या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. माणगाव पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार तलाव पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे.