: हिंदू धर्मात आणि धर्म पुराणानुसार सुखी जीवनासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. स्वयंपाक घरातही वर्षातील काही असं दिवस असतात त्या दिव...
धर्म पुराणानुसार एकादशीला भात शिजवल्या जात नाही. तसाच काही सणाच्या दिवशी चपाती किंवा पोळी बनवणं वर्ज्य मानलं जातं.
त्यातील पहिला सण आहे मकर संक्रांत. यंदा 15 जानेवारीला साजरा करण्यात येणाऱ्या या सणाच्या दिवशी चपाती किंवा पोळी करणे अशुभ मानलं जातं. यादिवशी बाजरीच्या भाकरीवर तिळ लावून खाल्लं जातं.
या वर्षी शीतला अष्टमी 2 एप्रिलला साजरी करण्यात येणार असून यादिवशी गॅस लावणे चुकीचं मानलं जातं. या दिवशी देवीला शिळ अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो.
या वर्षी नागपंचमी 9 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी तवा गरम करणे, काही कापने अशुभ मानलं जातं. या दिवशी हलवापुरी खाण्याची परंपरा आहे.
शरद पौर्णिमेच्या दिवशीही घरी चपाती करण्यावर बंदी असते. या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांमध्ये निपुण असल्यामुळे संध्याकाळी खीर तयार करून चंद्रप्रकाशात ठेवून तो प्रसाद म्हणून ग्रहण करण्यात येतो. यंदा 16 ऑक्टोबरला शरद पौर्णिमा आहे.
लक्ष्मीशी संबंधित कोणत्याही सणाच्या दिवशी घरी चपाती किंव पोळी करत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार देवी माता लक्ष्मी नाराज होते. तिला पुरीचा नैवेद्य आवडतो.
घरात कोणाचा मृत्यू झाल्यास घरात चपाती किंवा पोळी करत नाही. हिंदू धर्मात तेराव्या विधीसाठी कायदा सांगण्यात आला आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)