ांची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ असते. बॉलिवूडमध्ये असे कमी चित्रपट आहेत, ज्यात फक्त एक-दोन गाणी आहेत. पण असे काही चित्रपट आहेत, ज्...
बॉलिवूड चित्रपटांमधील गाणी कायमच खास राहिले आहेत. कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेला मनाला भिडण्याचं ते काम करतात आणि प्रेक्षकांच्या मनात ही गाणी देखील घर करून जातात. बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक गाणी असतात कारण प्रेक्षकांसाठी गाणी फार महत्त्वाची असतात.
काही चित्रपटांमध्ये गाणी नव्हती तर काही चित्रपटांमध्ये खूप गाणी असल्यामुळे ते लक्षात राहिले. आज ज्या चित्रपटात 9 गाणी होती त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आनंद' या चित्रपटाविषयी आपण चर्चा करतोय. आजही लोक या चित्रपटाविषयी बोलताना दिसतात. या चित्रपटात एकूण 9 गाणी आहेत. ज्यांचं म्यूजिक सलिल चौधरी यांनी लिहिलं आहे. ही गाणी गुलजार आणि योगेश यांनी लिहिली आहेत.
हे गाण लता मंगेशकर, मुकेश आणि मन्ना डे या गायकांनी गायलं आहे. 'कहीं दूर जब दिन ढल जाए', 'जिंदगी कैसी है पहेली', 'मैंने तेरे लिए' आणि 'ना जिया लागे ना' सारखी गाणी ही चित्रपटाच्या पटकथेला आणखी खोलवर बनवतात आणि आजही त्या प्रेक्षकांना आवडतात.
या सगळ्यात गाण्यांमधून जर कोणतं गाणं हे प्रेक्षकांच्या मनाला भिडलंय तर ते 'कहीं दूर जब दिन ढल जाए' आहे आणि 'जिंदगी कैसी है पहेली' आहेत. मुकेश यांच्या आवाजात असलेलं हे गाणं एकटेपणा आणि आयुष्यातील सत्य खूप चांगल्या प्रकारे दाखवताना दिसत आहे.
मन्ना डे यांच्या दमदार आवाजात असलेलं 'जिंदगी कैसी है पहेली हे गाणं आनंद यांचा जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टीकोण समोर आणतोय. 'मैंने तेरे लिए' आजही एक रोमॅन्टिक भावना दर्शवतो आणि लोकांना भावूक करतात. या गाण्यांना आजही यूट्यूब, आणि गाण्याचे अॅप्सवर खूप ऐकायला मिळतं.
जर या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर त्याचं दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी केलं होतं. यात राजेश खन्ना यांनी आनंद ही भूमिका साकारली होती आणि अमिताभ बच्चन यांनी डॉक्टर भास्कर यांची भूमिका साकारली होती. त्यासोबत सुमिता सान्याल, रमेश देव आणि सीमा देव सारखे कलाकार देखील दिसले होते.
चित्रपटाची पटकथा ही एका तरुण मुलावर आहे, ज्याला कॅन्सर होतो. पण तो त्याचे शेवटचे काही क्षण देखील हसत व्यथित करतो. तो ना फक्त आनंदी राहतो तर त्यासोबत त्याच्या आजुबाजूच्या लोकांना देखील आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो.
‘आनंद’ या चित्रपटाच्या बजेटविषयी बोलायचं झालं तर जवळपास 1 कोटी असल्याचं म्हटलं जातं. तर त्यावेळी ही रक्कम फार मोठी होती आणि आज जर तुलना करायला गेलो तर ती 81 कोटी रुपयांची आहे. तर 1971 मधील हा चित्रपट सगळ्यात हिट ठरला. हा चित्रपट राजेश खन्ना यांच्या 17 हिट चित्रपटांमध्ये एक होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासोबत अनेक पुरस्कार मिळाले.