भारतातील सर्वात रहस्यमयी पर्यटनस्थळ आपल्या महाराष्ट्रात आहे. इथं एका डोंगरात 36 गुहा आहेत.
...महाराष्ट्रात भारतातील सर्वात रहस्यमयी गुहा आहे. इथं एका डोंगरात 36 गुहा आहेत. हे ठिकाण महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.
प्रत्येक गुहेच्या भिंतींवर कोरीवकाम आहे. हे कोरीवकाम रामायण, महाभारत आणि इतर पौराणिक कथांवर आधारित आहे.
वेरुळ लेणी परिसरात गूढ शांतता आहे. तसेच येथे आवाजचा प्रतिध्वनी एकू येतो.
येथील गुहा क्रमांक 16 ही सर्वात मोठी गुहा आहे. ही गुहा कैलास मंदिर म्हणून ओळखली जाते. हे मंदिर वरपासून खालपर्यंत एकाच दगडाला कापून बांधण्यात आले आहे. याचे कोरीवकाम खूपच बारीक आहे. हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे 200 वर्षे लागली असे सांगितले जाते.
या संपूर्ण ठिकाणी एकूण 34 लेण्या आहेत, त्यापैकी काही बौद्ध धर्माशी, काही हिंदू धर्माशी आणि काही जैन धर्माशी संबंधित आहेत.
वेरूळच्या लेण्या सहाव्या ते दहाव्या शतकादरम्यान बांधल्या गेल्या. त्या एकाच डोंगराला तोडून बनवल्या गेल्या.
वेरुळ लेणीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. या लेण्या भारतातील ऐतिहासिक वारशांमध्ये गणल्या जातात.
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ लेणी आहेत. हे ठिकाण औरंगाबादपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे.