PHOTOS

‘नारळी पौर्णिमे’ला कोळी बांधव समुद्राची पूजा का करतात? कारण तुम्हाला माहितीच हवे!

Narali Purnima 2025 Importance in Marathi:नारळी पौर्णिमा आणि समुद्राचे नाते काय? या दिवशी समुद्राची पूजा का केली जाते? हे प्रश्न कधी तुम्हाला पडलेत का? याची उत्तरे जाणून घेऊयात. 

Advertisement
1/8
‘नारळी पौर्णिमे’ला कोळी बांधव समुद्राची पूजा का करतात? कारण तुम्हाला माहितीच हवे!
‘नारळी पौर्णिमे’ला कोळी बांधव समुद्राची पूजा का करतात? कारण तुम्हाला माहितीच हवे!

Narali Purnima 2025 Importance in Marathi: नारळी पौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. कोळी बांधवांचा मुख्य सण म्हणूनही नारळी पौर्णिमेकडे पाहिले जाते. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा का करतात, हे जाणून घेऊयात. 

2/8

महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. विशेषतः किनारपट्टीच्या भागात उत्साहाला उधाण येते. कोळी समाज समुद्राची पूजा करुन हा सण साजरा करतात. 

3/8

नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी समाजाकडून नारळ अर्पण केला जातो. तसंच, हो़डीचीदेखील पूजा केली जाते. काही ठिकाणी समुद्राला सोन्याचा नारळदेखील अर्पण केला जातो. 

 

4/8

कोळी बांधव हे समुद्राला देव मानतात. समुद्रातूनच त्यांनी अन्न व उपजिनीकेचे साधन मिळते. ते पूर्णपणे समुद्रावर अवलंबून असतात.

5/8

नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी पुन्हा सुरू केली जाते. समुद्राला नारळ अर्पण करुन पुन्हा व्यवसाय सुरू केला जातो. 

6/8

कोळी बांधव खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात. समुद्रात अनेक भयंकर वादळे, लाटा अशा नैसर्गिक आपत्तींपासून त्याचे रक्षण करावे यासाठी ते समूद्राची पूजा करतात.

7/8

निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळीबांधव हा सण साजरा करतात. महिला समुद्रदेवाची पूजा करतात. मासेमारीसाठी निघालेल्या आपल्या पतीच्या सुरक्षिततेसाठी त्या समुद्राची मनोभावे पूजा करतात. 

8/8

नारळी पौर्णिमेला कोळी बांधवाच्या बोटीही छान पताका व रंगरंगोटी करुन सजवल्या जातात. नारळाचा सोन्याचे वेष्टन किंवा पत्रा गुंडाळून विधिवत समुद्राला अर्पण केले जाते. नारळ हा सर्जनशक्तीचे प्रतीक मानले जाते. ओल्या नारळाच्या करंजीचा नैवैद्य बोटीला व समुद्राला दाखवतात. नंतर ही बोट समुद्रात सोडली जाते.  





Read More