भारतात अशी एक जागा आहे जिथे काजू टोमॅटोपेक्षा ही कमी किंमतीत विकले जातात.
सुक्या मेव्याचं सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. सुक्यामेव्यातील पोषक घटकांमुळे मेंदू आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. काजूच्या सेवनाने त्वचेचा पोत सुधारतो.
महाराष्ट्रात काजूची शेती सर्वाधिकपणे कोकणात केली जाते. ओल्या काजूची उसळ आणि काजूची फेणी हे कोकणात अत्यंत आवडीने खाल्लं जातं.
साधारणपणे बाजारात काजूचा दर 1,000 रुपये प्रति किलो इतका आहे. काजूचं उत्पादन फार कमी होत असल्याने त्याचा दर देखील जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाला किलोने काजू विकत घेणं परवडत नाही.
कोकणात काजूची लागवड केली जाते, मात्र कोकणापेक्षाही सर्वात जास्त काजूचं झारखंड राज्यात केलं जातं. जामतारा जिल्ह्याला 'काजूंचं गाव'म्हणून ओळखलं जातं.
देशात सर्वात जास्त काजूची लागवड जामतारामध्ये केली जाते. मागणी प्रमाणेच पुरवठा होत असल्याने इथे काजू किरकोळ भावात विकले जातात.
जामतारा जिल्ह्याची बाजारपेठ खास ओल्या काजूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ओल्या काजूंच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांची मोठी गर्दी असते.
जामतारामध्ये काजूची किंमत सुमारे 45-50 रुपये प्रति किलो आहे, तर प्रक्रिया केलेल्या काजूंची किंमत साधारणत: 150-200 रुपये प्रति किलो इतकी आहे.
या शिवाय केरळमध्ये कोल्लम येथे देशातील 80 टक्के काजूची आयात निर्यात केली जाते. केरळला देखील काजूचं शहर म्हटलं जातं.