बॉलिवूडची अभिनेत्री अमृता सिंगचं सैफ अली खानशी लग्न होण्यापुर्वी रवी शास्त्री यांच्यासोबत खास संबंध होते. मात्र, नेमकं कोणत्या कारणावरुन यांचं नातं तुटलं, पाहूयात सविस्तर.
भारतामध्ये क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं फार जुनं आहे. क्रिकेटच्या मैदानावरचा जलवा आणि रुपेरी पडद्यावरील ग्लॅमर यांचा संगम नेहमीच चर्चेचा विषय असतो. अशाच काही चर्चेत राहिलेल्या प्रेमकथांपैकी एक होती क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग यांची.
80 च्या दशकात रवी शास्त्री हे केवळ त्यांच्या दमदार फलंदाजीसाठीच नाही, तर देखण्या व्यक्तिमत्त्वासाठीही प्रसिद्ध होते. दुसरीकडे, अमृता सिंग बॉलिवूडमध्ये एक नामांकित, ग्लॅमरस आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती.
एका मासिकाच्या कव्हर शूटदरम्यान दोघांची भेट झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. पहिल्या भेटीतच दोघं एकमेकांकडे ओढले गेले आणि पुढे त्यांच्यातील जवळीक वाढत गेली.
यानंतर अमृता अनेकदा क्रिकेट स्टेडियममध्ये रवी शास्त्रीला प्रोत्साहित करताना दिसली. माध्यमांमध्ये त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांच्या चाहत्यांनीही या जोडीला भरभरून प्रेम दिलं.
काही काळातच दोघांनी लग्न करण्याचा विचार केला आणि 1986 मध्ये त्यांचं नातं लग्नाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं.
मात्र, त्यांच्या नात्याला एक विचित्र वळण मिळालं. एका मुलाखतीदरम्यान अमृताने विनोद करत म्हटलं की तिचं पुढचं प्रेम विनोद खन्नासोबत असू शकेल. हा मजेशीर बोललेला शब्द रवी शास्त्रींना इतका लागला की त्यांनी हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला.
काही अहवाल असंही सांगतात की, रवी शास्त्रींना आपल्या पत्नीने कुटुंबाला करिअरपेक्षा महत्त्व द्यावं असं वाटत होतं. मात्र, अमृताने स्पष्ट केलं की ती करिअर सोडणार नाही, परंतु भविष्यात चांगली पत्नी आणि आई नक्की बने
यानंतर दोघांनी आपापल्या वाटा वेगळ्या केल्या. रवी शास्त्रींनी 1990 मध्ये रितू शास्त्रीशी लग्न केलं, तर अमृताने 1991 मध्ये अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. अशा रीतीने एका सुंदर प्रेमकथेचा शेवट 'फिल्मी' स्टाइलने अधूराच राहिला.