ा पिणाऱ्यांच्या या यादीच तुमचंही नाव येतं का? दिवसातून किमान दोनदा तरी चहा पिणं होतंय का? ही माहिती वाचा... भारतामध्ये चहाप्र...
Is Reheating Tea Dangerous For Body: चहाशिवाय आमचं पानच हलत नाही... चहाशिवाय दिवस सुरु झाला असं वाटतच नाही... ही अशी चहावरील प्रेम व्यक्त करणारी वाक्य अनेकदा ऐकायला मिळतात.
भारतीयांचं चहावर असणारं प्रेम लपून राहिलेलं नाही. पण, चहाचं अती प्रमाणातील सेवन मात्र शरीरास हानिकारक ठरू शकतं. याहूनही चहाबाबतची आणखी एक सवयही शरीराचं नुकसान करु शकते.
अनेकांच्या घरी चहा एकदा बनवल्यानंतर तो, उरला तर पुन्हा गरम करून प्यायला जातो. असं करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक असाल, तर आताच सावध व्हा. कारण, ही सवय धोक्याची सूचना आहे.
चहा वारंवार गरम केल्यास त्याची चव पूर्णपणे बिघडून जाते. तर, बऱ्याच वेळापासून बनवून ठेवलेल्या चहामध्ये टॅनिनचं प्रमाण वाढतं. ज्यामुळं चहा कडू होत जातो.
चहा तयार केल्यानंतर तुम्ही तो तीन ते चार तासांनंतर पित असाल तर, त्याचे शरीरावर नकारात्मक परिणाम दिसून येतात. अशा चहामध्ये अनेकदा बॅक्टेरिया वाढतात.
चहा वारंवार गरम केल्यास त्यातील पोषक तत्त्वं नष्ट होण्यासोबतच अपचन, पोट फुगणं, मळमळणं, पोटदुखी या आणि अशा काही समस्या सतावू लागतात.
दुधाचा चहा असल्याच त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका अधिक असतो. ज्यामुळं अनेकदा आतड्याचे विकार आणि पोटाचं आरोग्य बिघडतं. त्यामुळं चहा बनवल्यानंतर तो 10 ते 15 मिनिटांच्या आत पिऊन संपवणं अपेक्षित असतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)