सध्या चर्चा आहे ती म्हणजे आमिर खानची. लाल सिंग चड्ढा हा त्याचा चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला होता. त्यावर 'बाहुबली'चे दिग्दर्शक ...
आमिर खानला सगळेच मिस्टर परफेक्टशनिस्ट म्हणून ओळखतात. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे एस.एस. राजमौली यांनी केलेल्या एका वक्तव्याची.
मागील वर्षी अभिनेता आमिर खान याचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रचंड प्रमाणात फ्लॉप झाला होता.
त्यातून या चित्रपटाविषयी प्रचंड प्रमाणात टीकाही झाली होती. यावर बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांनी आमिर खानचा हा चित्रपट पाहून आमिर खान किती ओव्हरएक्टिंग करतो असं म्हटलं होतं. याविषयी खुद्द आमिर खानचा भाऊ मन्सूर खाननं एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, मन्सूर खान यांनी सांगितले की, जेव्हा एस.एस.राजमौली यांनी जेव्हा आमिर खानला अशी प्रतिक्रिया दिली तेव्हा आमिर खान विचारात पडला.
सध्या राजमौलींच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
यावेळी एस.एस.राजमौली यांच्या या प्रतिक्रियेनंतर मात्र केआरकेनंही नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
सध्या आमिर खाननं ब्रेक घेतला आहे परंतु तो लवकरच एका बायोपिकमधून दिसणार असल्याची चर्चा आहे.